शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

मांजरा प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला; लातूरसह चार शहरांना भेडसावणार समस्या

By हणमंत गायकवाड | Updated: May 27, 2024 16:23 IST

मागील दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून होतोय पाणीपुरवठा

लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, लातूर एमआयडीसी आदी मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात जिवंत साठा संपलेला आहे. आता मृतसाठ्यातून प्रस्तुत गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी मांजरा प्रकल्पात ०.१७ टक्के म्हणजे ०.३०४ दलघमी जिवंत पाणीसाठा होता. मात्र आता जिवंत साठा शून्य झालेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे झाले आहे. 

लातूर शहरासाठी दररोज मांजरा प्रकल्पातून ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या उचल केलेल्या पाण्यातून पाच दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होतो. मार्च महिन्यामध्ये आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मृतसाठ्यावर आता पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे लातूरकरांना जपून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून पुरवठाशुक्रवारी जिवंत साठ्यातील पाणी उचलले होते. शनिवारी मांजरा प्रकल्प मृतसाठ्यात आला. ४७.१३० दलघमी मृतसाठ्याची क्षमता आहे. आता प्रकल्पात ४६.८२८ दलघमी मृतसाठा आहे. दोन दिवसांत एवढी घट पाण्याची झालेली आहे. प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत पाणी पुरू शकते. तोपर्यंत पावसाळ्याचे तीन महिने संपलेले असतात. त्यातून नवीन पाण्याची आवक झाली तर टंचाई जाणवणार नाही. सद्य:स्थितीत मात्र मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

पाण्याची उचल आणि बाष्पीभवन वाढलेउन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याचा वापरही वाढलेला आहे. शिवाय, बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. एक दलघमी पाणी बाष्पीभवनात जात आहे. तर ५० ते ६० एमएलडी पाणी लातूर शहरासाठी उचलले जात आहे. धरणावर अवलंबून असलेल्या सगळ्या गावांना मिळून एक दलघमी पाणी उचलले जाते, अशी घट दररोजची होत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका