शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले; निलंगा पालिकेकडे विजबिलाची पावणेचार कोटींची थकबाकी !

By संदीप शिंदे | Updated: April 1, 2024 13:24 IST

वारंवार वीजपुरवठा खंडित : उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन कसे होणार

निलंगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणी असूनही केवळ पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे निलंगा शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीची ३ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांची थकबाकी तर ४५ लाखांची पाणीपट्टी अशी एकूण ३ कोटी ७१ लक्ष ८६ हजार रूपयांची थकबाकी आहे. त्यात महावितरण तर कधी सिंचन उपसा विभागामुळे पाणीपुरवठा बंद होतो आणि तांत्रिक बिघाड तर नेहमीच होत असतो. अशीच स्थिती राहिली तर उन्हाळ्यात पाणीपुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित होत आहे.

निलंगा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अथक प्रयत्नातून माकणी धरणावरून ४० किलोमीटर पाइपलाइन अंथरूण शहराला पाणीपुरवठा सुरळीत चालू केला. मात्र, २५ ते ३० वर्षांनंतर ही सर्व यंत्रणा जीर्ण झाल्यामुळे व लिकेजसचे प्रमाण वाढल्याने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ही संपूर्ण योजना करून घेतली होती. संबंधित गुत्तेदाराने ही योजना पूर्ण कार्यान्वित न करता गडबडीत पालिकेला हस्तांतरण केले. त्यामुळे यातील सर्व दोष तसेच राहिल्यामुळे वारंवार लिकेजसचा अडथळा येऊन पाणीपुरवठा ठप्प होऊ लागला आहे. परिणामी, नागरिकांना अशा कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अशातच शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे सांगण्यात येऊन नळाला मीटर बसवण्यात आले. मात्र ते आजही नादुरुस्त अवस्थेत पडून असून, विनाकारण निधीचा चुराडा झाला आहे. सर्व शहरातील नागरिकांनी या नवीन पाईपलाईनचे डिपॉझिट भरून नळ कनेक्शन घ्यावे या हेतूने पालिका प्रशासनाने शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या योजनेत दोष तर आहेतच त्यातच महावितरण कंपनीची थकबाकी कोट्यवधी रुपये असल्याने वारंवार पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा बंद केल्याने पाणी वितरण बंद होते.

पालिकेने नियोजन करण्याची मागणी...या थकबाकीत लघुदाब १७ लाख ४० हजार, उच्चदाब १ कोटी ६८ लाख ३७ हजार रुपये, नगरपरिषद दिवाबत्ती उच्चदाब १ कोटी ३९ लक्ष ९३ हजार, नगरपरिषद कार्यालय १ लाख १६ हजार अशी एकूण ३ कोटी २६ लक्ष ८६ हजार महावितरणची थकबाकी तर ४५ लाख रुपये पाणीपट्टी असे एकूण ३ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये थकबाकी आहे. याच थकबाकीमुळे कायम पाण्याचा त्रास होणार असेल तर पालिकेने याबाबत काय नियोजन केले आहे, त्यासंबंधी ठोस पावले उचलून कायमस्वरूपी बंदोबस्त करावे अशी मागणी निलंगावासीयांनी केली आहे.

शहरातील ६५ बोअरवेल सुरु करावेत...निलंगा शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीच उपाययोजना अद्याप राबविलेली नाही. उन्हाची तीव्रता पाहून उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका