शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

उड्डाण पुलाच्या कामामुळे लातूरच्या सात वस्त्यांचा पाणी पुरवठा बंद 

By हणमंत गायकवाड | Published: September 12, 2022 5:41 PM

या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवर नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील आर्वी जलकुंभाअंतर्गत असलेल्या सात वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या वस्त्यांतील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. 

लातूर मनपाच्या आर्वी जलकुंभाअंतर्गत आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम आदी शहरालगतचा भाग आहे. या भागातील हजार ते बाराशे कुटुंबांचे नळकनेक्शन आर्वी जलकुंभाअंतर्गत पाईपलाईंवर आहे. मात्र लातूर-अंबाजोगाई रोडवर असलेल्या उड्डाण पुलाचे काम नॅशनल हायवेमार्फत चालू असल्याने मनपाला पुरवठा बंद कावा लागला आहे. पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. मनपाने या भागातील नागरिकांची सद्य:स्थितीत कसल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पर्यायी व्यवस्था न करताच काम सुरू... आर्वी गायरान, हनुमान नगर, सोमवंशी नगर, डाळ मिल भाग, गडदे नगर, भगवानबाबा नगर, कौशल्यधाम नगरात मनपाच्या नोंदीनुसार कमीत कमी हजार ते बाराशे नळकनेक्शन आहेत. या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची पर्यायी सोय न करता पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मुबलक असताना या भागातील नागरिकांना आता टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उड्डाण पुलाचे काम कधी पूर्ण होणार, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण कधी होणार, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सध्या तरी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा किती दिवस बंद राहील, किती दिवस नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल, याबाबतचे कसलेही नियोजन मनपाच्या पाणीपुरवठा विभागात नाही. पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

नागरिकांनी सहकार्य करावे जोपर्यंत काम सुरू आहे, पाईपलाईन टाकून जोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काही तरी पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठा विभागाकडून केली जाईल. तूर्त नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे. नॅशनल हायवेमार्फत उड्डाण पुलाचे काम चालू आहे. त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे कळविले आहे. - कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग मनपा

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणी