शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

लातूर शहरात दर आठवड्याला तीन दिवस राहणार पाणी पुरवठा बंद

By हणमंत गायकवाड | Updated: March 17, 2024 18:06 IST

२०११च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,७५४ इतकी असून, सध्याची एकंदर लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे.

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ९.५१ टक्के अति अल्प जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे लातूर महापालिकेने पाणी बचतीचा निर्णय घेतला असून, दर आठवड्याला तीन दिवस पाणीपुरवठा बंद, तर चार दिवस प्रकल्पातून पाणी उचलून शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे महिन्याला दीडऐवजी एक दलघमी पाणी लागणार आहे. अर्ध्या दलघमची बचत महिन्याला होणार आहे. नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सन २०११च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,७५४ इतकी असून, सध्याची एकंदर लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. १४५ लिटर दरडोई दररोज याप्रमाणानुसार शहरातील नागरिकांना ६७.५० दलली इतके पाणी लागते. २०% तूट आणि दहा टक्के इतर मागणी गृहीत धरले तर शहराला दैनंदिन ढोबळ पाणी मागणी ८९.१० दलली इतकी आहे. या गरजेनुसार महिन्याला अर्धा दलघमी पाणीबचत या उपायोजनेतून केली जात आहे. महिन्याला १.५ दलघमी पाणी उचलले जात होते. परंतु, सध्या एकदलघमी. पाणी उचलले जात आहे. तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून चार दिवस पाणीपुरवठा आठ दिवसाला होईल, या पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वितरणही केले जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली.

शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा राहतो बंद

मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस जलकुंभनिहाय पाण्याचे वितरण केले जात असून, त्याचे वेळापत्रक मनपाने प्रसिद्ध केलेले आहे.शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. मांजरा प्रकल्पातूनही पाणी उचलले जात नाही.बचतीचा हा उपाय गेल्या आठवड्यापासून सुरू आहे.

बचतीचा उपक्रम दोन महिने राबविल्यास एक महिन्याची बचत 

लातूर शहराला लागणारे पाणी आणि केलेली बचत याचे गणित केले तर एक महिन्याला लागणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. महिन्याला अर्धा दलघमी म्हणजे एक दलघमी पाण्याची बचत होईल. दोन महिने हा उपक्रम राबविल्यास एक दलघमी पाणी बचत होणार आहे.

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाई