शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा !

By हरी मोकाशे | Updated: February 8, 2023 18:35 IST

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उद्या मेळावा

हरी मोकाशे

लातूर : गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री, रमाई आवास योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातील १९ हजार ५०३ घरकुले अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांचा शुक्रवारी प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. अद्यापही ११ हजार ३३१ अपूर्ण आहेत. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत २४ हजार ५३२ घरकुले मंजूर असून १६ हजार ३६० पूर्ण आहेत. तर ८ हजार १७२ अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत. शुक्रवारी लाभार्थ्यांचा प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात समुपदेश करून, घरांचे महत्त्व, अनुदानाची माहिती दिली जाणार आहे. या कामास गती देण्यासाठी पंचायत समिती गणांना नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समुपदेशन केले जाणार...

घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात त्यांच्या समस्या जाणून घेऊन समुपदेशन केले जाणार आहे. या मेळाव्यास लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

- कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.

घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार...

घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. मुदतीत घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच घरकुलासाठी जागा नाही, अशांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.

- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी. 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना