शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

चिंता वाढली : थकीत कर्जवसुलीसाठी बँकेचे कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारी! दुष्काळी परिस्थितीत बळीराजा हैराण

By हरी मोकाशे | Published: September 20, 2023 9:58 PM

यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

लातूर : यंदा पावसाने ताण दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अशा परिस्थितीत थकीत पीककर्ज वसुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा शेती उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे आता कर्जाची परतफेड कशी करावी, अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यंदा पाऊस उशिरा झाल्याने खरिपाच्या पेरण्याही विलंबाने झाल्या. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने खरिपाच्या उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. त्यानंतरही पावसाने उघडीप दिल्यामुळे पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष कसे काढावे, अशी भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे. उजाडलेला प्रत्येक दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.

चाकूर येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. याअंतर्गत जानवळ, शिवणखेड, शिवणी, रायवाडी, रामवाडी, केंद्रेवाडी, महाळंगी अशी गावे जोडण्यात आली आहे. या गावातील शेतकऱ्यांना बँकेच्या वतीने पीककर्जाचे वाटप करण्यात येते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत कर्ज वाटप करण्यात आले. मात्र, काही शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने आता वसुली मोहीम सुरू केली आहे.

बँक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत...सध्या शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी, कर्मचारी हे थकीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात आहेत. शेतकऱ्यांना बोलावून घेऊन घरासमोर थांबलेले फोटो घेत आहेत.

तत्काळ वसुली थांबवावी...पाऊस नसल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी थकीत पीककर्ज वसुलीसाठी घरापर्यंत येत आहेत. शासनाने ही वसुली थांबवावी. दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी.- दत्तात्रय पवार, शेतकरी

१० कोटींची थकबाकी...जानवळ परिसरातील जवळपास २ हजार शेतकऱ्यांकडे दोन-तीन वर्षांपासून पीककर्ज थकीत आहे. ते जवळपास १० कोटी आहे. वसुलीसाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ पीककर्जाची परतफेड करावी.- सूरज बिडवे, बँक मॅनेजर 

 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक