शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेफ विकास खन्नांनी पोस्ट केलेला फोटो व्हायरल, महिला हरणाला दूध पाजतानाचा टीपलं दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 16:41 IST

या फोटोत जगातील सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर भूतदया भाव दिसून येतोय.

ठळक मुद्देशेफ विकास खन्ना यांनी असाच एक फोटो शेअर करत मानवतेचं वेगळं रुप नेटिझन्सना दाखवून दिलं आहे.शेफ विकास खन्ना यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. आई आपल्या लेकरांवर मनापासून प्रेम करते. आपल्या लेकरांसाठी आई काहीही करू शकते.

जोधपूर - मानवतेचं सगळ्यात भव्य रुप माहितेय का तुम्हाला? मानवतेचं सगळ्यात मोठं रुप आहे दया. शेफ विकास खन्ना यांनी असाच एक फोटो शेअर करत मानवतेचं वेगळं रुप नेटिझन्सना दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. शेफ विकास खन्ना यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. या फोटोत एक महिला हरणीच्या पिल्लाला स्वत:चं दूध पाजताना दिसत आहे. बिश्नोई समाजातील महिला या फोटोत दिसतेय. हा फोटो शेअर करताना विकासने सांगितलं आहे की या महिलेने अनेक हरणांच्या पिल्लांना जीवनदान दिलंय. असं म्हटलं जातं की, बिश्नोई समाजातील महिला प्राण्यांना नुसतं पाळत नाहीत तर त्यांना त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळतात. एवढंच नाहीतर या समाजातील पुरुषही बेवारस हरणांना पकडून आपल्या घरी पाळतात. 

विकास खन्ना यांनी हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, मानवतेचं सगळ्यात मोठं रुप दया आहे. या महिलेने मला सांगितलं की तिने अनेक अनाथ आणि जखमी हरणांच्या पिल्लांना स्वत:चं दूध पाजून जीवनदान दिलं आहे. हा फोटो राजस्थानच्या जोधपूर येथे क्लिक केलेला आहे.’ आई आपल्या लेकरांवर मनापासून प्रेम करते. आपल्या लेकरांसाठी आई काहीही करू शकते. पण प्राण्यांना आपलं दूध पाजणारी आई तुम्ही कधीच पाहिली नसेल. पण राजस्थानमधील बिश्नोई समाजातील अनेक महिला प्राण्यांवर आपल्या लेकरांप्रमाणेच जीव लावतात. 

आणखी वाचा - शेफ होण्याचं स्वप्न पाहणारा एक दोस्त

बिश्नोई समाजाचं नाव भगवान विष्णूच्या नावाने पडलं आहे. हा समाज पर्यावरणाची पूजा करतो. राजस्थानच्या वाळवंटामध्ये या समाजातील लोक आढळतात. जंगलात राहणारा हा समाज हिंदू गुरू श्री जम्भेश्वर भगवानला मानतात. काही वर्षांपूर्वी झाडांचं संरक्षण व्हावं याकरता 'चिपको आंदोनल' करण्यात आलं होतं. त्यामध्ये या समाजाची अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. एकंदरीत काय तर, पर्यावरणाला जपणारा, त्यांची निगा राखाणार, पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाचा मान राखणारा समाज सध्या अंधारात असला तरीही त्यांच्यामुळेच पर्यावरणाचं संवर्धन होत आहे.

सौजन्य - www.timesnownews.com

टॅग्स :Chef Vikas Khannaशेफ विकास खन्नाRajasthanराजस्थान