शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"हिंदूंचा देश, हा धर्माचा देश अन् भाजप धर्मासोबत'; प्रज्ञा ठाकूर यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 16:10 IST

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५ राज्याच्या विधानसभांचा कौल भाजपासाठी अधिक महत्त्वाचा होता

भोपाळ - देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर, निवडणुका पार पडल्यानंतर आज ४ राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. दुपारपर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजपने तीन राज्यात स्पष्ट बहुमताची आघाडी घेतली आहे. तर, तेलंगणात काँग्रेसने बीआरएसच्या गाडीवर स्वार होऊन बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. या निकालानंतर भाजपा समर्थक आणि नेत्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर, वरिष्ठ भाजपा नेत्यांनीही प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनीही निकालावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५ राज्याच्या विधानसभांचा कौल भाजपासाठी अधिक महत्त्वाचा होता. या निवडणुकांमधून जनतेचा कौल समजून घेऊन भाजपा पुढील २०२४ ची रणनिती ठरवणार आहे. त्यामुळेच, या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले होते. ५ पैकी ४ राज्यातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून तीन राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. या निकालावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. आता, हिंदुत्त्वाचा विजय असल्याचे सांगत साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनीही उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली. 

''देशाच्या मनात मोदी आहेत, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या मनात मोदी आहेत. विकास, महिला सन्मान, राष्ट्र की रक्षा आणि हिंदुत्त्व आहे. भाजपच्या काळात काम झालंय, योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, तेच तर आहे. काम बोलतंय, म्हणूनच पूर्ण बहुमताचं सरकार येत आहे,'' असे म्हणत खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिली. तसेच, हिंदुत्वाचा अजेंडा पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय? या प्रश्नावरही प्रज्ञा ठाकूर यांनी परखडपणे उत्तर दिलं. 

हा हिंदूचा देश आहे, राहणारच, धर्माचा देश आहे, राहणारच आणि भाजपा धर्मासोबत आहे, असे म्हणत खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.  

गडकरींनीही सांगितला विकास

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. ''देशातील जनतेनं या निवडणुकांमधून आपला मूड दाखवून दिलाय. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपला मोठं यश मिळालंय. मोदींच्या नेतृत्त्वात आमच्या सरकारने जी रणनिती ठरवली होती, त्यास जनतेनं एकप्रकारे समर्थन देत पाठिंबा केला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचं विशेष आभार मानतो, अभिनंदन करतो. तसेच, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो,'' अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीदिली आहे. 

फडणवीसांनीही व्यक्त केला आनंद

दरम्यान, आजच्या निकालानंतर भाजपा नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत एमपीच्या मनात मोदीच असल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थोडक्यात प्रतिक्रिया दिली. ''मी आत्ता एवढंच सांगेन, मी आनंदी आहे, यावर मी सविस्तर बोलेन, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ४ राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तसेच, विकास आणि विश्वास, देश केवल मोदीजी के साथ, अशीही प्रतिक्रिया फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

निवडणूक निकाल अपडेट पाहा -

https://cms.lokmat.com/node/803768

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरBJPभाजपाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी