शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बाबांच्या जिवावर निवडणुका जिंकता येत नाहीत; बागेश्वर बाबांचा राजकारण्यांना झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 19:59 IST

दरबारामध्ये बागेश्वर बाबांनी वन मंत्री विजय यांची पोलखोल केली होती. यजमान नक्कीच वनमंत्री आहेत, पण पंडालचा खर्च सरकारी तिजोरीतून दिला आहे, असे बाबांनी सर्वांच्या समक्ष म्हटले होते.

वनमंत्र्यांची पोलखोल केल्यानंतर बागेश्वर बाबांनी राजकारण्यांना चांगलाच झटका दिला आहे. निवडणुका आल्या की मंत्र-संत्री सारे बाबा, साधुंच्या आश्रयाला जातात. त्यांचे अनुयायांचा पाठिंबा मिळविण्याचा राजकीय हेतू यामागे असतो. यावर बागेश्वर बाबांनी वक्तव्य केले आहे.

पत्रकारांशी बोलताना बागेश्वर यांनी बाबांच्या जिवावर निवडणुका जिंकता येत नाहीत, तर जनतेलाच बाबा मानले तर नक्कीच जिंकता येईल, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलाश सारंग यांनी बागेश्वर यांना बोलविले होते. 

या दरबारामध्ये बागेश्वर बाबांनी वन मंत्री विजय यांची पोलखोल केली होती. यजमान नक्कीच वनमंत्री आहेत, पण पंडालचा खर्च सरकारी तिजोरीतून दिला आहे, असे बाबांनी सर्वांच्या समक्ष म्हटले होते. मंत्री मनाने अत्यंत शुद्ध असल्याचे शास्त्री म्हणाले होते. पंडाल मोठा आहे आणि खूप खर्च येत आहे. त्यामुळे नेत्यांनी आम्हाला बोलवून सर्व खर्च वाचवला, असे बागेश्वर बाबा म्हणाले होते. 

कधी काँग्रेस बाबांना कार्यक्रमांना बोलवत आहे, तर कधी भाजपा असा खेळ मध्य प्रदेशात सुरु आहे. दोन्ही पक्ष आता बाबांच्या मदतीने निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे बागेश्वर बाबांचे हे वक्तव्य अशा नेत्यांना झटका देणारे आहे. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामPoliticsराजकारण