शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 10:11 IST

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिग्विजय सिंह (Digvijay Singh) म्हणाले की, जे माझी अंत्ययात्रा काढत आहेत, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, मला त्यांच्या या आशीर्वादाची गरज नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल, तेव्हा ते आले तर खूप उपकार होतील.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जे माझी अंत्ययात्रा काढत आहेत, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, मला त्यांच्या या आशीर्वादाची गरज नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल, तेव्हा ते आले तर खूप उपकार होतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना ‘आशिक का जनाजा है जरा धूम से निकले’, असं विधान केलं होतं. त्यावर पलटवार करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जे माझी अंत्ययात्रा काढत आहेत, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, मला त्यांच्या या आशीर्वादाची गरज नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल, तेव्हा ते आले तर खूप उपकार होतील. आपल्या देशात संसदीय प्रणाली आहे. येथे जनता आपला लोकप्रतिनिधी निवडते. भ्रष्टाचार समाप्त करण्याची गरज आहे. खरा प्रश्न जनतेच्या अधिकारांचा आहे. ते संपुष्टात आणले जात आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला. 

दिग्विजय सिंह म्हणाले की, खरा मुद्दा हा सातत्याने वाढत चाललेल्या महागाईचा असला पाहिजे. गरीब त्रस्त आहेत. सुशिक्षित तरुणांना नोकर मिळत नाही आहे. तरुण त्रस्त आहेत. पंचायतींचे अधिकार समाप्त केले गेले आहेत. आज असं सरकार आहे ज्याला जनतेच्या कुठल्या कामाशी देणंघेणं नाही. वारसा कर, मंगळसूत्र आदी विधानांवरूनही दिग्विजय सिंह यांनी मोदी आणि भाजपाला टोला लगावला. प्रचारामध्ये मंगळसूत्र कुठून आलं. मच्छी-मटन कुठून आलं. मुस्लिम लीग कुठून आली. आम्ही गरिबी हटवू इच्छितो. सुशिक्षितांना रोजगार देऊ इच्छितो.  महागाई कमी करू इच्छितो. २०० रुपयांत एका कुटुंबायाचा उदरनिर्वाह कसा काय चालू शकतो. मजुरी वाढलेली नाही. खाद्यतेलाची महागाई वाढलीआहे. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली आहे, अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केली.

ते पुढे म्हणले की, जर केंद्रात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं तर मजुरी ४०० रुपये करण्यात येईल. काँग्रेसने नेहमीच गरीब आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ केली आहेत. दुसरीकडे केंद्रातील भाजपा सरकारने मोठमोठ्या उद्योगपतींचं १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाहBJPभाजपाmadhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४