शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला तडे? आता नितीश कुमारांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 19:54 IST

Madhya Assembly Election 2023: मध्य प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची राजकीय पक्षांची पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे.

मध्य प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची राजकीय पक्षांची पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिय आघाडीला आपलं ऐक्य दाखवण्याची संधी होती. मात्र ऐक्याचे हे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. एकीकडे मध्य प्रदेशमधील जागावाटपावरून समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाले असतानाच आता नितीश कुमार यांनीही मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नितीश कुमार यांनी मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारांची आधीच घोषणा केलेली आहे. त्यामुळे येथे काँग्रेस आणि जेडीयू आमने-सामने येणार आहेत. एकीकडे विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करत असलेल्या नितीश कुमार यांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने मध्य प्रदेशमधील पिछौर, राजनगर, विजय राघवगड, थांदला आणि पेटलावद विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारांची आधीच घोषणा केलेली आहे. मात्र येथे काँग्रेस आपले उमेदवार बदलणार असल्याची चर्चा आहे. तरीही जनता दल युनायटेडने येथून उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये काहीच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस