शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“पक्षाचे संकल्पपत्र आमच्यासाठी गीता, रामायणासारखे पवित्र”; CM मोहन यादव स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 17:36 IST

Madhya Pradesh CM Mohan Yadav News: हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विरोधकांना लगावला.

Madhya Pradesh CM Mohan Yadav News ( Marathi News ): आमच्यासाठी भाजपाचे संकल्पपत्र हे भगवद्गीता आणि रामायणाच्या पवित्र ग्रंथासारखे आहे. हे संकल्पपत्र आमच्या सरकारचा पुढील पाच वर्षांचा अजेंडा ठरवेल. लोकांच्या मूलभूत गरजांसाठी काम करणे हे राज्य सरकारचे काम आहे. त्यासोबतच राज्याचा व देशाचा लौकिक वाढविण्यावरही भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले आहे. विधानसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

भाजपाने एका चहा विक्रेत्याला पंतप्रधान आणि मजूर कुटुंबातील मुलाला मुख्यमंत्री केले. हे फक्त भाजपाच करू शकते. काँग्रेसमध्ये अशा गोष्टींचा अभाव आहे. हे लोक लंडनला जाऊन कपडे खरेदी करतात, त्यांना काय समजणार? असा खोचक सवाल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलावे, अशी मागणी विरोधकांनी केली. 

भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल

भाजपमध्ये पुढच्या पिढीची काळजी घेतली जाते. पण काँग्रेस पक्षाला यासाठी मोठा धक्का बसावा लागतो. काँग्रेसचा अहवाल खराब आहे. अरुण यादव यांनी खूप काम केले, पण काँग्रेस पक्षाने कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांना पुढे केले. भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल, असा टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लगावला.

आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते

मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, भाजपाचे संकल्पपत्र हे पवित्र ग्रंथासारखे आहे. आमच्यासाठी ते गीता आणि रामायणासारखे आहे. हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे. आम्ही तुमच्याशी पाच वर्षांनी संकल्पपत्राबाबत बोलू. आमचे सरकार आल्यापासून आम्ही अनेक अजेंडे पुढे नेत आहोत. आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते, असे मोहन यादव यांनी नमूद केले.

दरम्यान, काही लोक दिवसाची सुरुवात सूर्योदयाने करतात तर काही सूर्यास्तानंतर. पण, रात्री बारा वाजल्यापासून दिवस बदलण्याची ही कसली सुरुवात, असे मुख्यमंत्री यादव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री यादव यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, हे खूप चांगले आहे, आजपासून राज्याचा वेळ का बदलत नाही, असा खोचक सवाल काँग्रेस नेते जयवर्धन सिंह यांनी केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा