शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 21:37 IST

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने (BJP) आपल्या आमदारांकडून अहवाल मागवला आहे. ज्या मतदारसंघात कमी मतदान झालं आहे, त्याचं कारणही तेथील आमदारांना विचारण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने आपल्या आमदारांकडून अहवाल मागवला आहे. ज्या मतदारसंघात कमी मतदान झालं आहे, त्याचं कारणही तेथील आमदारांना विचारण्यात आलं आहे. आमदारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पक्षनेतृत्व या अहवालाचा अभ्यास करणार आहे. २५ मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर किंवा ३० मे नंतर कधीही भाजपाच्या नेत्यांची बैठक बोलावली जाऊ शकते. या बैठकीसाठी मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी डॉ. महेंद्र सिंह, सहप्रभारी सतीश उपाध्याय हेसुद्धा मध्य प्रदेशमध्ये येणार आहेत. 

प्रभारी, सहप्रभारी यांच्यासह मध्य प्रदेश भाजपाचे दिग्गज नेते या अहवालाचं अध्ययन करतील. मात्र ३० मे पर्यंत मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा निवडणूक प्रचारासाठी इतर राज्यांमध्ये असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भाजपाच्या अर्ध्या आमदारांनी अहवाल सादर केला आहे. जे निवडणूक प्रचारासाठी गेलेले आहेत, त्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे. आमदारांकडून मिळणारा अहवाल आणि पक्षाने तयार केलेला अहवाल यांची पडताळणी केली जाईल. तसेच त्या आधारावर आमदारांचं आकलन होईल, तसेच त्यामधून त्यांचं राजकीय भविष्य निर्धारित केलं जाईल. 

भाजपाने आमदारांकडून माहिती मागवलेले आठ प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत१) आमदारांच्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कशी होती?२)मतदान केंद्रनिहाय मतदानाच्या टक्केवारीची स्थिती कशी होती.३) कुठल्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ३७० मतं अधिक पडली. ४)जिथे कमी मतदान झालंय, त्याचा पक्षाच्या सकारात्मक निकालावर किती परिणाम होईल?५)मतदानाची टक्केवारी कमी होण्याचं मूळ कारण काय आहे? ६) आमदारांनी मतदान वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले?७) पक्षाच्या कुठल्या नेत्याने खूप मेहनत घेतली आणि कुणी केवळ औपचारिकता पूर्ण केली.८) प्रचारादरम्यान आमदार ग्रामीण भागात किती रात्री वास्तव्याला राहिले?

दरम्यान, भाजपाने आमदारांकडे मागवलेल्या या अहवालावर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपाला फिडबॅक घेण्याची काय गरज आहे. निवडणूक आयोगापासू सगळी व्यवस्था त्यांचीच आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या संगीता शर्मा म्हणाल्या की, अजून काही उरलं तर ईव्हीएम सेट केली जाते. मात्र एवढं सारं करूनही भाजपा फिडबॅक घेत असेल तर त्यांना वास्तव समजलं आहे, आपला पराभव होणार हे त्यांना कळून चुकलंय. त्यांनी जे लक्ष्य समोर ठेवलं होतं, त्यापेक्षा ते खूप मागे राहिले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस