शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 1:44 PM

महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्र्यांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यातील एक नाव म्हणजे, मध्य प्रदेशातील सावित्री ठाकुर. त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लोकसभेवर  पोहोचल्या आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. माळवा भागातील आदिवासी महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक वर्षे कठीन परिश्रम घेले आहेत.

सावित्री ठाकुर या 'दीदी' नावाने ओळखल्या जातात. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मूवेल यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. 1996 मध्ये त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. त्या एका स्वयंसेवी संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी धारमधील आदिवासी आणि गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करायला सुरुवात केली. महिलांना छोट्या स्वरुपाचे कर्ज मिळवून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, याशिवाय, दारूबंदीसाठीही त्यांनी अथक परिश्रम घेतले. दहावी उत्तीर्ण असलेल्या सावित्री ठाकूर यांनी साधारणपणे एका दशकापर्यंत समाजसेविका म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

राजकारणात प्रवेश  करणाऱ्या ठाकुर या आपल्या कुटुंबातील पिहिल्याच सदस्य आहेत. त्यांचे वडील वनविभागातून निवृत्त  झाले आहेत. तर पती एक शेतकरी आहेत. त्या 2003 मध्ये भाजपमध्ये आल्या आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्या. यानंतर एकाच वर्षांत पक्षाने त्यांना जिल्हापरिषद अध्यक्ष बनवले. 2014 मध्ये ठाकुर यांना धारमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी १ लाख मतांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, यावेळी पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वासदाखवला आणि त्यांनीही पक्षाला निराश केले नाही.

सावित्री ठाकुर यांनी पक्षातही अनेक जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. त्या 2010 मध्ये जिल्हा उपाध्यक्ष झाल्या होत्या. यानंतर 2013 मध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार धामनोदच्या संचालक झाल्या. 2017 मध्ये, सावित्री यांना किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. आता त्या आदिवासी महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

त्या अत्यंत नम्र असून शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर असतात. त्या खते आणि बियाणांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात. त्यांनी गावांतील दारूच्या दुकानांनाही कडाडून विरोध केला. महत्वाचे म्हणजे, धारमधील आठ विधानसभा जागांपैकी पाच जागा काँग्रेसकडे आहेत. यामुळे ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात घेतल्याने या जागांवर भाजपला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश