शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 15:58 IST

मोदी म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे."

आज भारत देश इतिहासाच्या अत्यंत महत्वपूर्ण वळणावर उभा आहे. आपल्याला ठरवायचे आहे, भारतात व्होट जिहाद चालणार की राम राज्य चालणार. पाकिस्तानात दहशतवादी भारताविरोधात जिहादची धमकी देत आहेत आणि येथील काँग्रेसच्या लोकांनीही मोदी विरोधात व्होट जिहाद करा, अशी घोषणा केली आहे. अर्थात मोदी विरोधात एका विशिष्ट धर्माच्या लोकांना एजूट होऊन व्होट करा, असे सांगितले जात आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढवला. ते  मध्यप्रदेशातील खरगोन येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते. 

मोदी म्हणाले, 'विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीतील सहकाऱ्यांना लोकांच्या भवितव्याची चिंता नाही, ते आपले कुटुंब वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, आपण विरोधकांचा अजेंडा उघड करताच, विरोधकांनी आपल्या विरोधात 'अपशब्दांचा शब्दकोश' रिकामा केला. मोदी पुढे म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे."

''आपल्या मताने अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर बांधून 500 वर्षांची प्रतीक्षा संपवली. आपल्या प्रयत्नाने देश पुढे चालला आहे, असेही मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी