शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

"आम्हाला ना रामाची अडचण आहे ना रहमानची...! 10 दिवसांच्या आत 'नेमप्लेट' लावा"; धीरेंद्र शास्त्री यांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:11 IST

तत्पूर्वी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने कांवड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थ आणि फळांच्या विक्रिचा व्यवसाय करणारी दुकाने, हॉटेल, हातगाडीवाले आदींना नेमप्लेट लावून मालकाचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहिण्याचा आदेश दिला आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडप्रमाणेचबागेश्वर धाममधील दुकानांनाही नावाच्या पाट्या लावण्यास सांगितले आहे. शास्त्री म्हणाले, धाममधील सर्व दुकाने आणि उपहारगृहांबाहेर मालकाचे नाव असणे आवश्यक आहे आणि हे चांगले काम आहे. आपल्याला नाव लिहायला काय अडचण आहे? याचे तर कौतुकच व्हायला हवे.  

तत्पूर्वी, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने कांवड यात्रा मार्गावरील खाद्यपदार्थ आणि फळांच्या विक्रिचा व्यवसाय करणारी दुकाने, हॉटेल, हातगाडीवाले आदींना नेमप्लेट लावून मालकाचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहिण्याचा आदेश दिला आहे.

यानंतर आता मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे नियम बनवण्याची मागणी केली जात आहे. एवढेच नाही तर, बागेश्वर धाममध्येही हा नियम लागू केला जात आहे. धाम समितीच्या बैठकीत पीठाधीश्वर या आदेशावर शिक्कामोर्तब करतील.

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, "आम्हाला ना रामाची अडचण आहे ना रहमानची अडचण आहे, आम्हाला 'कालनेमीं'ची अडचण आहे. यामुळे आपल्या दुकानाबाहेर नेमप्लेट लावा. जेणे करून, येणाऱ्या भाविकांचा धर्म आणि पवित्र्य भ्रष्ट होणार नाही. आमची आज्ञा आहे की, बागेश्वर धाममधील सर्व दुकानदारांनी 10 दिवसांच्या आता नेम प्लेट लावाव्यात, अन्यथा धाम समितीकडून कायदेशीर कारवाई करण्यात येइल.

सर्वप्रथम असा निर्णय मुझफ्फरनगरमध्ये घेण्यात आला होता. येथे जिल्हा पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा भ्रम निर्माण होऊ नये, म्हणून कांवड यात्रा मार्गावरील सर्व खाद्यपदार्थ, फळांच्या दुकानांना आणि भोजनालयांना आपल्या मालकांची नावे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शुक्रवारी कांवड यात्रेकरूंच्या श्रद्धेचे पावित्र्य राखण्यासाठी राज्यभरातील कांवड यात्रा मार्गांवरील सर्व फळांची दुकाने, भोजनालये, उपाहारगृहे यांना मालकांच्या नावाची ‘नेम प्लेट’ लावण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर, हलाल सर्टिफिकेशन असलेली उत्पादने विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही आपल्या आदेशात म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानंतर, उत्तराखंड सरकारनेही अशाच प्रकारचा निर्णय घेत आहे.

विरोधकांचा विरोध -या निर्णयानंतर, ही राज्य सरकारद्वारे प्रायोजित 'कट्टरता' आणि 'मुस्लीम' दुकानदारांना लक्ष्य करणारी कारवाई असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव राज्य सरकारवर टीका करत म्हटले, 'असा आदेश म्हणजे सामाजिक गुन्हा आहे. शांततापूर्ण वातावरण खराब करण्याची सरकारची इच्छा आहे.'

भाजप नेत्यांकडून स्वागत -या निर्णयाचा भाजपच्या अनेक नेत्यांनी बचावही केला आहे. यांपैकी यूपीचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, "काही मुस्लीम दुकानदार, हिंदू नावांच्या आडून यात्रेकरूंना नॉन व्हेज खाद्य पदार्थांची विक्री करतात. ते वैष्णो ढाबा भंडार, शाकुंभरी देवी भोजनालय आणि शुद्ध भोजनालयासारखी नावे लिहितात आणि मांसाहारी भोजन विकतात."

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामUttar Pradeshउत्तर प्रदेशUttarakhandउत्तराखंडMadhya Pradeshमध्य प्रदेश