शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 12:18 PM

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

भोपाळ - राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि घरोघरी नळातून पिण्याचे पाणी देण्याची घोषणा केली. त्यासाठी, मध्य प्रदेश सरकारतर्फे कटनी क्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना राबवण्यात येत असल्याचे सांगितले. कटनी जिल्ह्यातील विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यात चौहान यांनी उपस्थितांना संबोधित करताना यापूर्वीच्या सरकारमधील आणि विद्यमान सरकारमधील फरक सांगितला. राज्यातील जलसिंचन क्षेत्रात मोठी वाढ होत असून सिंचन योजनांच्या माध्यमातून शेती पाण्याखाली आणली जात असल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटलं. 

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कटनी परीक्षेत्रासाठी १०११ कोटी रुपयांची जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली असून ८० हजार एकर जमिन ओलिताखाली येणार आहे. तसेच, कटनी तालुक्यातील बहोरीबंद येथील ८६, रीठी येथील १७ आणि स्लीमनाबादच्या ४३ गावांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. तर, जलजीवन मिशनद्वारे कटनी जिल्ह्यातील रीठी जनपदच्या १०९ आणि कटनी जनपदच्या ५० गावांसह जिल्ह्याच्या पठारी प्रदेशातील १५९ गावांमध्ये आता नळाद्वारे सहजपणे पाणी पोहोचणार आहे.

कटनी जिल्ह्यातील बडगांव येथील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील जलसिंचन व मिशन जलजीवन योजनांबाबत माहिती दिली. यावेळी, त्यांनी कटनी जिल्ह्यातील ३१३ कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. राज्यातील विकासकामांची माहिती देताना महिला भगिंनीसाठी नुकतेच सुरु केलेल्या लाडली बहन योजनेचा उल्लेख करत राज्यात सरकार नसून कुटुंब आहे. एक कुटुंब म्हणून आपण राज्याचा कारभार चालवत आहोत. राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा या कुटुंबाचा सदस्य आहे, असेही यावेळी चौहान यांनी म्हटले.  

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMadhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान