शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 5:53 AM

पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र कोकणासह विदर्भातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे १ लाख २४ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. पुरात वाहून जाणे, वीज पडणे व इतर दुर्घटनांमध्ये तब्बल ९४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तीन हजारांहून अधिक पशूंचाही दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला. पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले.

मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा 

महिनाभरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे अद्यापही सर्वदूर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यात १७, जालन्यात २५, बीडमध्ये २७ जनावरे दगावली.  धाराशिवमध्ये २७४ घरांचे, तर पालघरमध्ये ३४१ घरांचे नुकसान झाले. दुर्घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ तर पालघरमध्ये ८ जणांचे मृत्यू झाले.

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील महातपुरी शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. भगवान शिवाजी चव्हाण (३८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते एका झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी वीज कोसळली.

कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पातळीमध्ये गुरुवारी एका इंचाने वाढ झाली. परंतु पुन्हा दुपारनंतर ही पातळी कमी होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ७३ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.    

ऑगस्ट महिन्यात देशभरात कसा असेल पाऊस?

पुणे : राज्यामध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. तर येत्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी दिला. ऑगस्टमध्ये देशात सरासरी पाऊस पडेल, काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी माॅन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. ते म्हणाले, यंदा देशामध्ये जून आणि जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा १.८ टक्के अधिक राहिले आहे. तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १८.४ टक्के पाऊस झाला.  

जुलै महिन्यातील पावसामुळे झालेले नुकसान

जिल्ह्याची    बाधित शेती    किती      पशुधन     पुरातून बाहेर    मालमत्तांचेस्थिती    हेक्टरमध्ये    झाले मृत्यू    दगावले     काढले     नुकसान नागपूर    २२८    १०    २८    २००    १४,५९१  भंडारा    २३,२६०    ०४    ३३    २,७१९    २,९३७गडचिरोली    १४,०७६    ०८    ६१    १८०    १,०६४गोंदिया    २,८९५    ०५    २५    ००    १,३६८चंद्रपूर    २३,८४६    ०५    ७०    ६७    २,९९५  वर्धा    ११,१९४    ०१    २३    ०३    ६३३बुलढाणा    १०,५४६    ००    ०४    ५९३    ९२  यवतमाळ    ३,१००    ०७    ४६    ०२    ४१५पुणे    ५७४.९१    ०९    १५    ४,४३५    १,०००कोल्हापूर    २५,०००    ००    १३    ४६३    २,४५८सांगली    ५,२२१    ०२    ००    ०४    ३११रायगड    ७४६    ०४    १८    १,७४७    ५९६रत्नागिरी    ३८१    ०५    १८    ०८    ७३३सिंधुदुर्ग    ५००    ०३    ३,२००    ६२०    १,०५०अकोला    ३,१४२    ०५    ००    ००    ४२सातारा    ५४    ०४    १३    ००    २०७अहमदनगर    ८२    ०१    ०६    ०२    ०७   नंदुरबार    ८०    ०१    ११२    ००    ३८ 

 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसMaharashtraमहाराष्ट्र