शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

विष्णुपूरीच्या १० दरवाजांचे आयुष्य संपले

By admin | Published: April 10, 2017 8:14 PM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 10 - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़ आश्चर्य म्हणजे नवीन दहाही दरवाजे तयार असून ते तीन वर्षांपासून धूळखात पडून आहेत़ सदरील दरवाजे बसविण्यासाठी गोदावरी महामंडळ निधी देत नसल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे़गेल्या वर्षी प्रकल्प तुडुंब भरला होता़ यंदाही समाधानकारक पाऊस झाला तर प्रकल्पातील पाणी साठवून ठेवता येईल इतकी क्षमता दरवाजांमध्ये नाही़ हा विषय तीन वर्षांपासून प्रलंबित आहे़ दुरुस्तीचे काम, प्रशासकीय मान्यतेच्या फेऱ्यात अडकलेले दरवाजे तयार असूनही बसविले जात नाहीत़ अधीक्षक अभियंता बी़एस़ स्वामी यांनी १० मार्च २०१७ रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे़ तसेच विष्णुपूरी पंपगृह विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अहवालाची प्रतही शासनाकडे आहे़ त्यानुसार पूरस्थिती निर्माण झाली तर मोठी दुर्घटना होवू शकते़ प्रकल्पाची सुरक्षितता व जनहितासाठी ४ कोटी ८६ लाखांचा तातडीचा निधी द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ हा संपूर्ण विषय राष्ट्रवादी बहुजन मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के़एल़सदावर्ते, सचिव एस़ झेड़ चिखलीकर यांनी चव्हाट्यावर आणला आहे़ सदरचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण झाले नाही तर उद्भवणाऱ्या दुर्घटनेबद्दल जनता माफ करणार नाही, असेही सदावर्ते, चिखलीकर यांनी म्हटले आहे़ प्रकल्पाच्या दरवाजांची अवस्था लक्षात घेवून विष्णुपूरी पंपगृह विभागाने अहवाल दिला होता़ त्यानुसार दापोली येथील कार्यशाळेत तयार केलेले नवीन दरवाजे आणण्यात आले़ शिवाय पाच दरवाजांची उर्वरित कामे खाजगी कंत्राटदाराकडून करून घेण्यात आली़ त्याचेही सुमारे तीन कोटींचे देणे आहे़ एकंदर सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आठ कोटींची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते़ परंतु निधीची तरतूद करण्यासाठी तीन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे़ (प्रतिनिधी)।सरकारची उदासिनता अक्षम्य - खा.अशोक चव्हाणअत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावरही शासन गंभीर नाही, सरकारची उदासिनता अक्षम्य आहे़, अशी टीका करीत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे बसविण्यासाठी तातडीने निधी पुरवावा, अशी भूमिका मांडली आहे़ लोकमतशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रकल्पांबाबत शासन दुजाभाव करीत आहे़ नवीन दहा दरवाजे तीन वर्षांपासून तयार आहेत़ ते बसविण्यासाठी निधी देण्याची तयारी शासन व महामंडळाची नसेल तर हा जनतेच्या आयुष्याशी खेळ आहे़ विष्णुपूरी प्रकल्पाद्वारे लाखो लोकांना पेयजलाचा पुरवठा होतो, हे तरी ध्यानात ठेवा, असा टोलाही खा़चव्हाण यांनी लगावला़