शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहावीची २९ तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:53 IST

दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. 

मुंबई : इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत जाहीर केले.दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. कोरोनाबाबत राज्य तसेच केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आधीच घेतला आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के उपस्थितीत सुरू आहेत आणि त्या ५० टक्के संख्येच्या ७६ टक्के विद्यार्थी उपस्थित असतात, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.कोरोना काळात शाळांनी शुल्क आकारण्याच्या मुद्यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतले आहेत. राज्य शासन पालकांसोबतच आहे. सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. लॉकडाउन काळात नोकऱ्या गेल्या. पगार कमी झाले, याची पूर्ण जाणीव शासनाला आहे. शासन आपली बाजू न्यायालयात मांडेल. दरम्यानच्या काळात शाळा अन्यायकारक वागत असतील, असा पालकांचा आक्षेप असेल तर त्यांनी शिक्षण विभागाशी, उपसंचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.इयत्ता बारावीची सराव परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान तर इयत्ता दहावीची सराव परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान होईल.

काेराेना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा - दहावी-बाराीच्या परीक्षांच्या काळात एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्याचे सत्र वाया जाणार नाही. त्याची फेरपरीक्षा घेतली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :examपरीक्षाVarsha Gaikwadवर्षा गायकवाडStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक