शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

राज्यात ११ टेक्सटाईल्स पार्क उभारणार

By admin | Published: January 12, 2016 2:07 AM

जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे

जालना : जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे राज्यात ११ टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी विदर्भात ६ व मराठवाड्यात ५ असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. जालनामध्ये आयोजित पीक प्रात्यक्षिक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मध्यप्रदेशातील कृषी विकास दर वाढीचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, केवळ शेततळ्यांमुळेच हे राज्य ३४ टक्के कृषी विकास दर गाठू शकले. यानंतर मागेल त्याला शेततळे देण्याची योजना राज्य सरकारची असून, आगामी पाच वर्षांत पाच लाख शेततळे उभारण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.राज्यात ८२ टक्के शेती कोरडवाहू असून, शाश्वत शेतीसाठी या क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यासाठी सरकारने वीज, पाणी, बियाणे या सुविधांसाठी गतवर्षी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यंदा ५ हजार कोटींची करणार असल्याचे मुख्यमंत्रीे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)- पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, तसेच जलसाठांच्या विकेंद्रीकरणसाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली.- पाच वर्षांत २० हजार गावांत ही योजना राबविली जाणार असून याचे चांगले परिणाम दिसून येत आहे. - एकाच वर्षात २४ टीएमसी पाणी साठवले गेले असून १४०० कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यातील ४०० कोटी रुपये शेतकरी आणि सर्वसामान्यांनी दिले आहेत.