शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

११ हजार कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन

By admin | Published: April 27, 2016 6:47 AM

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील ११ लाख ३५ हजार ३७२ शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावरील १२७२ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील ११ लाख ३५ हजार ३७२ शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावरील १२७२ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. ही रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीतून बँकांना देण्यात येणार आहे. या शिवाय, २१ लाख शेतकऱ्यांकडील ११ हजार कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना या निर्णयांचा फायदा होईल. २०१४ मधील खरिप पीक कर्जाच्या पहिल्या हप्त्यास एक वर्ष मुदतवाढ, खरिप हंगाम २०१५ च्या पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच, २०१२-१३ आणि २०१३-१४ मधील पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पुनगर्ठनामुळे आधी असलेल्या कर्जाचे सुलभ हप्ते पाडले जातील आणि आधीचे कर्ज असले तरी नव्याने कर्ज मिळू शकते. २०१४ च्या खरिप हंगामातील पुनर्गठन केलेल्या ३ हजार ५०३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी शेतकऱ्यांना ७०० कोटी रुपयांच्या पहिल्या वार्षिक हप्त्याची परतफेड करायची होती. या रकमेपैकी थकित ३०० कोटी रुपयांची परतफेड करण्यास एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या रकमेवरील ३६ कोटी रुपयांचे व्याज शासन भरणार आहे. या निर्णयाचा फायदा ५ लाख ३३ हजार ७४१ शेतकऱ्यांना होईल. तसेच २०१५-१६ मधील खरीप हंगामातील पीक कर्जापैकी शासनाने ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या गावातील ११ लाख ३५ हजार ३७२ शेतकऱ्यांच्या सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या थकित पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. या कर्जावरील प्रथम वर्षाचे संपूर्ण व्याज व दुसऱ्या वर्षापासून चार वर्षाचे (२०१७-१८ ते २०२०-२१ ) ६ टक्के दराने होणारे व्याज असे एकूण अंदाजे १२७२ कोटी रु पये शासनाकडून बँकांना देण्यात येणार आहे. २०२१ पर्यंतचे कर्ज आणि त्यावरील व्याजाचे अंदाजित आकडे प्रशासनाने काढले आहेत. शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या २४३८.९२ कोटी पीक कर्जाचे विशेष बाब म्हणून पुनर्गठन करण्यास मान्यता देण्याची विनंती रिझर्व्ह बँकेला करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)