शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

FRP न देणाऱ्या राज्यातील १२ कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

By admin | Published: January 11, 2016 6:03 PM

राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई केली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ११ -  राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी न दिल्याने ७ कारखान्यान्यांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत तर १३ कारखाने बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या उसापोटी एफ.आर.पी.चे ३२८ कोटी रुपये थकविणाऱ्या राज्यातील ४४ साखर कारखान्यांवर केवळ कारवाईची भाषा केली जात होती पण आज  साखर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. 
 
यामद्ये नाशिक - गिरनार, सोलापूर -  शंकर कुमादास, शंकर रत्न, नागपूर - अगस्ती वृद्धेश्वर प्रसाद शुगर, सांगली - महाकाली, माणगंगा, यशवंत खानापूर, सातारा - प्रतापगड, किसनवीर, पुणे - भीमा पाटस, या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  
साखर आयुक्तांनी मागील आठवड्यात एफ.आर.पी.नुसार पैसे न देणाऱ्या ५१ साखर कारखान्यांना गाळप परवाना रद्द करण्याची नोटीस बजावली होती.
मागील वर्षी (२०१४-१५) गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत न दिल्यास गाळप परवाना रद्द केला जाईल व आतापर्यंत केलेले गाळप विनापरवाना केले म्हणून कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. या नोटिसीनंतर जवळपास २१ साखर कारखान्यांनी पावणेदोनशे कोटी रुपये दिले.
 
मागील वर्षाचे पैसे न देणाऱ्या व यावर्षी गाळप हंगाम सुरू असलेल्या जवळपास ३० साखर कारखान्यांकडे २०० कोटींची रक्कम थकीत आहे. याशिवाय मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्या व यावर्षी बंद असलेल्या १४ साखर कारखान्यांकडे १२५ कोटी थकले आहेत