शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

दिव्यात पाण्याविना १२ तास!

By admin | Published: April 28, 2016 3:46 AM

दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे

ठाणे : दिवा हे शहर ठाणे महापालिकेत असूनही तेथील तीव्र पाणीटंचाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यासाठी त्यांनी एमआयडीसीला दोषी ठरवले आहे. या टंचाईविरोधात प्रा. कृष्णमूर्ती शिवा अय्यर यांनी नुकतेच १२ तास पाण्याविना राहून उपोषण केले. पण, त्याची दखल पालिकेने घेतलीच नाही. त्यामुळे दिव्यातील जनतेला पाणी मिळो किंवा न मिळो, त्याच्याशी ठाणे महापालिकेला देणेघेणे नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिव्यात पाणीटंचाई असल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने महिलांना पाण्यासाठी प्रसंगी मुंब्रा, ठाकुर्लीपर्यंत धाव घ्यावी लागते. ‘कॉमन मॅन’साठी लढा देणारे प्रा. अय्यर डोंबिवलीत सागावमध्ये राहतात. हे गाव महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी आहे. या गावातही पाणीटंचाई आहे. रविकिरण सोसायटीत पाणी येत नाही. तेथे पोहोच रस्ता नाही. यासाठी अय्यर यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यांनी उपोषणही केले होते. तसेच डोंबिवली ते मंत्रालय पदयात्रा केली. विमानतळाच्या विरोधासाठी डोंबिवली ते दिल्ली सायकलने प्रवास केला. अय्यर हे दिव्यातील पश्चिम भागात साऊथ इंडियन शाळा चालवतात. या शाळेत किमान एक हजार ५०० विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. या शाळेतही पाणी येत नाही. दिव्यातील पश्चिम भागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्याविरोधात अय्यर यांनी महावीर जयंतीला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत १२ तास पाण्याविना काढले. त्यांच्या सोबतीला दोन विद्यार्थीही होते. शाळेत पिण्यासाठी पाणी येत नाही. या परिसरातील महिला पाण्यासाठी मुंब्रा व ठाकुर्ली परिसरात धाव घेत आहेत. इतके भयाण चित्र दिवा परिसरात आहे. दिवा हे ठाण्याचे उपनगर आहे. पण, ठाणे महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. १२ तास पाण्याविना आंदोलन करून अय्यर यांनी महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी त्याला थंड प्रतिसाद देत केवळ निवेदन स्वीकारले. मात्र, पाणी कधी येईल, काय केले जाईल, याविषयी आश्वासन दिले नाही. (प्रतिनिधी)