शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

जगातील १२ कोटी ४० लाख मुलं शाळेपासून वंचित

By admin | Published: July 04, 2016 8:28 PM

२०११ पासून शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. जागतिक स्तरावर विचार केल्यास तब्बल १२४ दशलक्ष मुले आजही शाळेपासून वंचित आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ४ : २०११ पासून शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. जागतिक स्तरावर विचार केल्यास तब्बल १२४ दशलक्ष मुले आजही शाळेपासून वंचित आहेत. एवढेच नव्हे, तर यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे प्रति ५ विद्यार्थ्यांपैकी दोन मुले वाचन, लेखन आणि साधे गणितही करू शकत नाहीत. ही चिंताजनक बाब युनिसेफच्या ह्यजागतिक मुलांची सद्यस्थितीह्ण अहवालातून समोर आली. युनिसेफने तयार केलेल्या जगातील लहान मुलांची सद्यस्थिती (द स्टेट आॅफ द वर्ल्ड चिल्ड्रन) या वार्षिक अहवालाचे डिजिटल रूपात प्रकाशन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, युनिसेफच्या महाराष्ट्राच्या अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर तसेच दोन शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मराठवाड्यातील दुष्काळाची झळ लहान मुले व महिलांना अधिक प्रमाणात बसली असल्याचे सांगून लहान मुलांच्या तसेच महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने सर्वंकष शाश्वत विकास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी येथे केले.

राज्यातील आणि विशेषत: मुंबईतील स्त्री - पुरुष गुणोत्तर असमान असून तंत्रज्ञानाचा उपयोग स्त्रीभ्रूण हत्येसाठी होतो ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांची स्थिती सुधरविण्यासाठी प्रथम मातेची काळजी घेणे, तिचे पोषण, आहार, प्रसूतिपूर्व तपासणी, प्रसूतीनंतर काळजी इ. गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बालमृत्यू दर कमी करणे, शाळेतील मुलांची पटनोंदणी वाढविणे व दारिद्र्य निर्मूलन या क्षेत्रांमध्ये देशभरात लक्षणीय प्रगती झाली असली तरीही, पाच वर्षांखालील मुलांचे टाळता येण्याजोगे मृत्यूचे प्रमाण कमी करणे व लहान वयात होणारे विवाह टाळण्यासंदर्भात परिस्थिती सुधारण्यास अजूनही वाव असल्याचे राज्यपालांनी सांगितले. लहान मुलांच्या आरोग्यासाठी राज्य शासनातर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना युनिसेफच्या अहवालाची शासन योग्य दखल घेईल तसेच सर्व मुलांना व्यक्तित्व विकासाची योग्य संधी प्रदान करण्याच्या दृष्टीने पावले उचलेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. यावेळी राज्यपालांनी राधा शिंदे (अंबड, जालना) व इजाज इस्माईल (कोल्हापूर) या युनिसेफच्या प्रयत्नाने विपरीत परिस्थितिवर मात करून शिक्षण घेत असलेल्या मुलांचे कौतुक केले. 

पाच वर्षांपर्यंतच्या मुलांवर लक्ष केंद्रीत करु राज्य शासन गर्भातील बालकांपासून ते पाच वर्षांच्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. माता आणि मुले यांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण आणि संरक्षण याबाबतच्या गरजा पूर्ण करण्याकरिता विविध पावले उचलत आहे. याकरिता विविध विभागांमध्ये समन्वय साधून माता आणि मुलांबद्दलच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमचे प्रयत्न अधिक व्यापक करण्याकरिता आम्ही सुरक्षित मातृत्व आणि शिशू पोषण धोरण स्वीकारत आहोत. तसेच राष्ट्रीय ईसीसीई २०१३ धोरणाच्या धर्तीवर राज्याचे ईसीसीई धोरण बनवत आहोत. अशा विविध प्रयत्नानी माता आणि मुले यांच्या जीवनात दीर्घकालीन चांगले बदल दिसून येतील, असे मुख्य सचिव स्वाधिन क्षेत्रीय यावेळी म्हणाले.

मुलांच्या हितासाठी तत्काळ पाऊले उचलावीत मुलांना सशक्त, सक्षम बनविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुले हे कायम बाल्यावस्थेत राहणे किंवा त्यांचा बौद्धिक विकास न होणे घातक आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी बरेच काही करता येऊ शकते, याची मला खात्री आहे. विशेषत: प्रयोगशीलतेतून बदलत्या वातावरणात आपोआपच बदल होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर त्याचे दीर्घकालीन परिणामही दिसून येतात. यासाठी प्रत्येक मुलाला चांगले जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे महाराष्ट्र युनिसेफच्या क्षेत्रीय कार्यालय प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर यांनी सांगितले

गरिबी, निरक्षरता आणि बालमृत्यू हानिकारक 

योग्य वेळी योग्य काळजी न घेतल्याने किवा वेळीच प्रतिबंधात्मक उपायांची खबरदारी न घेतल्यास २०३० पर्यंत बालमृत्यू ही स्थिती ६९ दशलक्ष एवढी होण्याची भीती आहे. १६७ दशलक्ष मुलांवर गरिब परिस्थितीत राहण्याची शक्यता आहे. - तब्बल ७५० दशलक्ष महिला बालवयातच लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. - १९९० नंतर बालमृत्यूच्या प्रमाणात घटही झाली आहे. तथापि, हा बदल म्हणजे प्रगती म्हणता येणार नाही. कारण पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण आजही दुप्पट आहे. - दक्षिण आशिया आणि सब सहारन आफ्रिकेतील निरक्षर मातांनी जन्म दिलेल्या मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गरिबांच्या घरातील महिलांच्या मुलांचे बालमृत्यूचे प्रमाण दुप्पट आहे, असे या अभ्यासातून समोर आले आहे. - १९९० नंतर गरिबीत जीवन जगणाऱ्या लोकांचे प्रमाण जवळपास निम्म्याने कमी झाले आहे.