शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

...तर तुमचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 09:36 IST

तीन महिन्यांत मुंबईतल्या १,२४७ जणांचे वाहन परवाने रद्द

मुंबई: गेल्या तीन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १ हजार २४७ जणांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्यानं आणि सिग्नल तोडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत २ हजार ८१४ रस्ते अपघात झाले होते. त्यात ४०३ जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी आरटीओला एक प्रस्ताव दिला होता. त्यानंतर वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी एक सूचना जारी केली होती. एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यास, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असल्यास, सिग्नल तोडत असल्यास त्याचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, असं महाराष्ट्र पोलिसांनी सूचनेत म्हटलं होतं. वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याची कारवाई झाल्यानंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो. 'एखादी व्यक्ती वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्यास तिचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल,' अशी माहिती वाहतूक विभागाचे प्रवक्ते अभय देशपांडे यांनी दिली. ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्य वाहतूक विभागानं राज्यभरातल्या एकूण १० हजार ३५१ चालकांचे परवाने रद्द केल्याची आकडेवारी देशपांडे यांनी दिली. या १० हजार ३५१ चालकांमध्ये मुंबईतल्या १ हजार २४७ जणांचा समावेश आहे. यातील ४३० जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर वापरल्यानं रद्द करण्यात आला आहे. तर ५२० जणांवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं कारवाई झाली आहे. राज्यभरात १४ हजार ३५२ जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्यानं रद्द करण्यात आला असून ४ हजार ७४७ जणांचे परवाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं रद्द करण्यात आले आहेत.