शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

१२ आदिवासी वाड्यांत पाणीटंचाई

By admin | Published: April 28, 2016 3:23 AM

कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात तेथील आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

नेरळ : कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात तेथील आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातील नेरळ-माथेरान घाटात असलेल्या १२ आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा कर्जत तालुका आदिवासी संघटनेने दिला आहे.माथेरानच्या मधल्या पट्ट्यात नेरळच्या जुम्मापट्टीपासून कर्जतच्या किरवलीपर्यंत १२ आदिवासी वाड्या आहेत. त्यातील सर्व वाड्या या उंच भागात वसल्या असल्याने तेथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. बेकरेवाडी,आसलवाडी, नान्याचामाळ, मन्याचामाळ, मना धनगरवाडा, सागाचीवाडी, चिंचवाडी, भूतिवलीवाडी, आषाणेवाडी, सावरगाव, किरवलीवाडी, धामनदांड,या १२ आदिवासी वाड्या माथेरानच्या मध्यावर वसल्या आहेत. वन विभागाच्या दळी जमिनीवर वसलेल्या या सर्व वाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता करता येत नाही. त्यामुळे रस्त्याअभावी तेथे पाणीटंचाई काळात टँकर देखील सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनासमोर तेथे पाणीपुरवठा करण्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या स्थितीत स्थानिक आदिवासी लोकांनी दाहीदिशा भटकत राहायचे का, हा प्रश्न अधांतरी आहे. परंतु आदिवासी लोकांनी पाणी न पिता तडफडून मरायचे का, असा प्रश्न कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शासनाने तेथे टँकर सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर )