शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

Maharashtra Unlock: १४ जिल्हे अनलॉक; उद्यापासून अंमलबजावणी, रेस्टॉरंट, बार, सिनेमागृह, जिम पूर्ण क्षमतेने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 5:16 AM

कोरोना आटोक्यात आल्याने राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना आटोक्यात आल्याने राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. नवीन नियमावली ४ मार्चच्या मध्यरात्री १२ पासून अंमलात येणार आहे. संबंधित १४ जिल्ह्यांमध्ये सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम सभागृहे किंवा मैदानाच्या ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचादेखील समावेश आहे.

या जिल्ह्यांमधील शाळा, काॅलेज, ऑफलाइन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील.  निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या १४ जिल्ह्यांची निश्चिती करताना पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण, दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त, पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी, आयसीयूमधील ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांहून कमी प्रमाणात भरलेले असणे हे निकष लावण्यात आले आहेत. या जिल्ह्यांना ‘अ’ श्रेणीत ठेवले आहे. अन्य जिल्हे ‘ब’ श्रेणीत आहेत.  

- सार्वजनिक क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व आस्थापनांच्या स्टाफला लसीकरण आवश्यक.

- सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण आवश्यक.

- मॉल, थिएटर, नाट्यगृह, पर्यटनस्थळ, उपाहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी भेटी देणाऱ्या अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण आवश्यक.

- कारखान्यांमधील कामगारांचे पूर्ण लसीकरण अनिवार्य असेल.

१०० टक्के क्षमतेने ‘हे’ सुरू 

शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्वीमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क

- खासगी आणि सरकारी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी.

- सार्वजनिक ठिकाणी १००% क्षमतेने कामकाजाची मुभा, इतर जिल्ह्यांमध्ये हे ५० टक्क्यांपर्यंत असेल.

- १४ जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांत संबंधित सेवांना ५० टक्के क्षमतेची मर्यादा असेल.

- सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

- ५० टक्के उपस्थितीची मर्यादा: सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम सभागृहे किंवा मैदानाच्या ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी दिली आहे.

- २२ दिवसांपासून नवे रुग्ण एक लाखाच्या आत राहिलेले आहेत. गेल्या २४ तासांत ८,८७१ रुग्ण बरे झाले. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लसीच्या १७७.५० कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

- हो, अर्थातच मास्कची सक्ती कायम: राज्यभरात मास्क वापराची सक्ती कायम असेल. मध्यंतरी अशी सक्ती मागे घेणार असल्याची चर्चा होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार