शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

महाराष्ट्रात 15 टक्क्यांनी घटलं मद्यसेवनाचं प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 10:55 AM

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावर मद्यविक्री करायला सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीचे चांगले परिणाम महाराष्ट्रात दिसू लागले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23- राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावर मद्यविक्री करायला सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीचे चांगले परिणाम महाराष्ट्रात दिसू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रात मद्यसेवनाचं प्रमाण 15 टक्क्यांनी घटलं आहे. 2016 आणि 2017 मधील आकडेवारी पाहता राज्यात मुंबई आणि ठाणे वगळता इतर शहरांमध्ये मद्यसेवनाचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
 
यासंबंधी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पुणे, नाशिक आणि कोल्हापूर भागात मद्यसेवनाचं प्रमाण अत्यंत कमी झाल्याचंही सर्व्हेत नमुद करण्यात आलं आहे. दारू पिऊन गाडी चालवण्यानं होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता सुप्रीम कोर्टानं राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारुची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 31 मार्च रोजी महामार्गालगतची दारूची दुकानं आणि बार बंद करा, असा थेट आदेश न्यायालयाने दिला होता.
 
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत एकुण 25,560 दारूची दुकानं तसंच बार आहेत, त्यापैकी 15,306 दारूची दुकानं आणि बार कोर्टाच्या आदेशानंतर बंद झाल्याची माहिती आहे. 
 
राज्यातील महामार्ग  आणि राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देणं बंद करा, असा महत्वपुर्ण आदेश  सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिला होता. त्यामुळे १ एप्रिलपासून हायवेवर मद्यविक्री पुर्णपणे बंद झाली आहे