शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

१६ अधिकाऱ्यांचे निलंबन मागे?

By admin | Published: April 11, 2015 5:52 AM

जिल्ह्यातील धान्य घोटाळा प्रकरणी नऊ तहसीलदारांसह १६ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी

नाशिक : जिल्ह्यातील धान्य घोटाळा प्रकरणी नऊ तहसीलदारांसह १६ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विधिमंडळात केली होती. मात्र, महसूल अधिकाऱ्यांच्या संघटनेने गिरीश बापट यांची शुक्रवारी भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय स्थगित करण्याचे आश्वासन दिले. मात्र, याबाबतचे अधिकृत आदेश सोमवारी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रेशन दुकानातील धान्याच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्य शासनाने तहसीलदारांसह, अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. मात्र, महसूल संघटनांनी या घोषणेचा निषेध करीत सरकारने तोंडी व चुकीच्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेतल्याचा आरोप करीत लेखणीबंद आंदोलन पुकारले. त्यात महसूल संघटनांच्या पदाधिकारी व नऊ निलंबित तहसीलदारांनी शुक्रवारी दिवसभर महसूलमंत्री, अन्न व नागरी पुरवठामंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गिरीश बापट यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली. त्याचबरोबर १५ ते १८ डिसेंबर २०१४ या कालावधीत शासनाच्या नागरी पुरवठा खात्याच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणी अहवालाचीदेखील माहिती तपासली. त्यामध्ये निलंबित तहसीलदारांबाबत त्रुटी आढळून न आल्याने निलंबन मागे घेतले जाणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)