शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 06:19 IST

राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

नागपूर : राज्य शासनातर्फे दोन टप्प्यांत ७२ हजार पदांची महाभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये १६ टक्के पदे मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राखीव ठेवण्यात येतील. त्यानंतरच ती पदे भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत केली.राजकारण करण्याच्या आपल्याला अनेक जागा आहेत. पण जेथे शेकडो वर्षांपासून राज्यभरातील गोरगरीब शेतकरी विठ्ठलभेटीच्या ओढीने येतात तेथे जाऊन राजकारण करू नये. तसे झाले तर ते त्या वारकऱ्यांविरुद्धचे आंदोलन ठरेल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.मराठा समाजातील युवकांना शासनाने शुल्क सवलत, उत्पन्न मर्यादा, वसतिगृहांची सोय असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क सवलत दिली आहे. या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.> विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाबाबत शासनाने कायदा केला.

> न्यायालयीन प्रक्रियेत ही बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. त्याच्यावर अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या न्यायाधीशांचे निधन झाल्याने न्या. गायकवाड यांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. सध्या आयोगाच्या अध्यक्षांमार्फत प्रक्रिया सुरू असून त्यांच्या मार्फत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.> या आयोगाच्या अहवालानुसार आरक्षणाबाबत शासन निर्णय घेईल. शासनाच्या वतीने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू.महापूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखणारमराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास विठ्ठलाच्या पूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखू, असा इशारा नाशकात सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे. पंढरपुरात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतदेखील असाच इशारा देण्यात आला होता.मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हास्यास्पदमराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखून ठेवण्याचे केलेले वक्तव्य हास्यास्पद व सुप्रीम कोर्टाचा अवमान त्यातून होत आहे. - अ‍ॅड प्रकाश आंबेडकर,भारिप, बहुजन महासंघाचे नेते

धनगर आरक्षणाचा अहवाल तयार : धनगर आरक्षणासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, यासाठी टाटा सामाजिक संस्थेचा सर्व्हे पूर्ण झाला असून, त्यांचा अहवालही तयार झाला आहे. तो लवकरच राज्य शासनाला सादर केला जाणार असून तो अहवाल आला की आपण लगेचच त्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करु.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८marathaमराठा