शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

१८० कोेटी लीटर पाण्याची बचत

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याची बचत करण्यात महाराष्ट्रात आघाडी मिळविली असून, पाण्याचा पुनर्वापर करून २००३ ते २०१६ या कालावधीत १८० कोटी लीटर पाण्याची म्हणजे जवळपास

- दयानंद पाईकराव,  नागपूरमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याची बचत करण्यात महाराष्ट्रात आघाडी मिळविली असून, पाण्याचा पुनर्वापर करून २००३ ते २०१६ या कालावधीत १८० कोटी लीटर पाण्याची म्हणजे जवळपास ३.५० कोटी रुपयांची बचत केली आहे. रेल्वेच्या इतर विभागात, तसेच एसटी महामंडळ आणि खासगी उद्योगात असाच पाण्याचा पुनर्वापर केल्यास महाराष्ट्रातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकेल.रेल्वे विभागात गाड्या-प्लॅटफॉर्म धुणे, रेल्वे रुळाची स्वच्छता यासाठी दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होते, परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याचे महत्त्व ओळखून नागपूर विभागात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा २००३ मध्ये पुनर्वापर सुरू केला. त्यासाठी २८.४८ लाखांचा प्रकल्प नागपुरात उभारला. त्यात दररोज ६ लाख लीटर पाण्याचे शुद्धिकरण करण्याची क्षमता आहे. सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ४ लाख लीटर पाण्याचे म्हणजे महिन्याकाठी १.२० कोटी लीटर पाण्याचे शुद्धिकरण होते.२००३ - २०१६ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जवळपास १८० कोटी लीटरच्या पाण्याचे शुद्धिकरण करून त्याचा पुनर्वापर केला. रेल्वेने एवढे पाणी महापालिकेकडून विकत घेतले असते, तर त्यांना तब्बल ३.५० कोटी रुपये मोजावे लागले असते.सध्या महाराष्ट्रात पाण्याची भीषण टंचाई पाहता, अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर केल्याने एक प्रकारे पाण्याची बचतच होत आहे. आम्ही आणखी अशाच प्रकारचे जलशुद्धिकरण केंद्र बल्लारशा येथे सुरू करणार आहोत. या प्रकल्पाची क्षमता सहा लाख लीटर प्रतिदिन राहणार आहे. या शिवाय नागपुरातील प्रकल्पाची क्षमता एक लाख लीटरने वाढविण्याचा विचार सुरू आहे.- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग