शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकऱ्यांना २० हजार कोटींचे विमाकवच

By admin | Published: April 19, 2016 4:11 AM

नैसर्गिक आपत्ती, कीड-रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’

मुंबई : नैसर्गिक आपत्ती, कीड-रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना २० हजार कोटींचे विमाकवच लाभेल, अशी माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.आजवर कर्ज घेणाऱ्या ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा घेता येत होता; मात्र आता कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक विमा घेता येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना होेईल. खरिपाच्या पिकासाठी शंभरी २ रुपये, रब्बीच्या पिकासाठी शंभरी दीड रुपया आणि खरीप व रब्बीच्या नगदी पिकांसाठी व फळबागांसाठी शंभरी ५ रुपये किंवा वास्तवदर्शी दरापैकी जे कमी असेल तेवढा हप्ता म्हणून भरावा लागेल. हप्त्याची बाकीची रक्कम राज्य व केंद्र सरकार भरणार आहे. (विशेष प्रतिनिधी)जागेवर मिळणार रक्कमविमा कंपनीला नुकसानीचा फोटो पाठविल्यानंतर तीन ते चार दिवसांच्या आत विमा कंपनीचे अधिकारी संबंधित नुकसानीची पाहणी करून नुकसानभरपाईपोटी २५ टक्के रक्कम जागेवरच देतील. त्यानंतर बाकीची रक्कम कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दिली जाईल. ज्यांनी कूळ म्हणून शेतीवर नोंद केली आहे, अशांना त्यांच्याच नावाने विम्याची रक्कम मिळेल.कृषी विमा योजना बंद राज्यात क्षेत्र (मंडळ/मंडळ गट/तालुका) हा घटक धरून राबविण्यात येत असलेली पूर्वीची राष्ट्रीय कृषी विमा योजना केंद्र सरकारने आता बंद केली आहे. त्याऐवजी प्रधानमंत्री पीक विमा ही नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारी हवामान आधारित पीक विमा योजना खरीप हंगामापासून राबविण्यात येणार नाही.