शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

२०२ लाचखोरांना सुटेना खुर्चीचा मोह, नागपूरमध्ये सर्वाधिक लाचखोरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 11:01 AM

२०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊन देखील २०२ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नागपूर परिक्षेत्रातील सर्वाधिक (५८) लाचखोरांसह मुंबईतील ३४ जणांचा समावेश आहे. 

मुंबई : अहमदनगरमधील एक कोटीच्या लाच प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच लाचखोरीच्या कारवाईत अडकलेले राज्यभरातील २०२ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत. त्यांच्यावर अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा झालेल्या १६ जणांवर बडतर्फीची कारवाईही झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आणि प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे लाचखोर खुर्चीवर ठाण मांडून बसल्याचे धक्कादायक वास्तव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून सामोरे आले आहे. यात नागपूरच्या लाचखोरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊन देखील २०२ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नागपूर परिक्षेत्रातील सर्वाधिक (५८) लाचखोरांसह मुंबईतील ३४ जणांचा समावेश आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार ग्राम विकास (५९) , शिक्षण, क्रीडा (४८), महसूल/नोंदणी/ भूमी अभिलेख (१८), सहकार पणन व वस्त्रोद्योग (६), नगर विकास (२७) आणि पोलिस, होमगार्ड आणि कारागृह विभागातील (१८) जणांचा समावेश आहे. तर, अन्य विभागांतील प्रत्येकी १ ते ४ जणांचा समावेश आहे. 

वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे... गेल्या वर्षी लाचखोरीच्या प्रकरणात राज्यात ७४९ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये सापळा कारवाईत १ हजार ३४ आरोपी पकडले गेले.  या वर्षी २ नोव्हेंबरपर्यंत ७११ गुन्ह्यांची नोंद होत १ हजार ३० जणांवर एसीबीने कारवाई केली. पण, लाचखोरीला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने लाचखोरांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे हे लाचखोर वर्षानुवर्षे तेथेच चिकटून आहेत.

कुठल्या परिक्षेत्रातील किती लाचखोर खुर्चीतपरिक्षेत्र        लाचखोर मुंबई            ३४ठाणे            १७पुणे               ११नाशिक            १३नागपूर            ५८अमरावती        ३१छत्रपती संभाजीनगर २१नांदेड           १७एकूण        २०२

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण