शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

२१ हजार शेततळे अद्याप कागदावरच

By admin | Published: July 12, 2017 4:27 AM

सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली

अण्णा नवथर । लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : सरकारची योजना मागेल त्याला शेततळे, अशी असली तरी जिल्ह्यातील २१ हजार शेततळे अद्याप कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे़ गेल्या दीड वर्षांत ४ हजार शेततळे खोदून झाले असून, पाचशे शेतकऱ्यांना अद्याप अनुदानच मिळालेले नाही़ प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात या योजनेला ‘कोरड’ पडली आहे़ जलयुक्त शिवार अभियानापाठोपाठ राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे, योजना जाहीर केली़ फेबु्रवारी २०१६ मध्ये ही योजना जिल्ह्यात सुरू झाली़ शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान, असे योजनेचे स्वरूप आहे़ पहिल्यावर्षी नगर जिल्ह्यासाठी ८५०० शेततळ्यांचे उदिष्ट्य होते़ क्षेत्रफळाच्या तुलनेत उदिष्ट्ये कमी होते़ यंदा त्यात ७०० शेतततळ्यांची सरकारने वाढ केली़ अर्ज केल्यानंतर शेततळ्यासाठी ५० हजारांचे अनुदान मिळेल, या आशेने जिल्ह्यातील २५ हजार ९४ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले़ त्यापैकी २३ हजार ८९ शेतकऱ्यांनी सेवा शुल्कही भरले़ मात्र १४ हजार २९८ अर्जांनीच मंजुरीचा ठप्पा गाठला़ तालुकास्तरीय समितीने हिरवा कंदील दाखविलेल्यांपैकी ११ हजार शेततळ्यांचा कार्यरंभ आदेशही दिला गेला़ परंतु, त्यापैकी ८९६ शेततळ्यांची कामे सुरू झाली असून, गेल्या दीड वर्षांत फक्त ४३६६ शेततळे पूर्ण झाले असून, त्यात पाणी साचले आहे़