शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

नरखेड मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 3:46 PM

Railway Accident in Narkhed: अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना    रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगाव नजीकच्या शिराळा येथे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना    रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. रेल्वे रुळाचे चाव्या (फिश प्लेट) काढण्यात आल्याने हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील डवरगाव येथील सोफिया औषनिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा मालगाडीने नेला जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते. मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळाखालून घसरले. मालगाडीचे चालक सुद्धा हैराण झाले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी ८ ते १० तास लागणार आहे. अकोला येथून मालगाडीचे डबे उचलण्यासाठी क्रेन मागविण्यात आली आहे. बडनेरा, अमरावती येथील रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने रविवारी नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर, या मार्गावरून धावणारी जयपूर ते सिकंदराबाद एक्स्प्रेस दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. मालगाडीचे डबे घसरल्याने मालहानी झाली अन्यथा,नरखेड - काचीगडा एक्स्प्रेस घसरली असती तर स्वातत्र्यदिनाच्या दिवशी मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शीनीचे म्हणणे आहे. 

 रेल्वे सुरक्षा बलाची गस्त नाहीअमरावती - नरखेड रेल्वे मार्गावर सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने नियमित गस्त करणे अनिवार्य आहे. मात्र, एक किमी अंतरापर्यंत रुळाच्या चाव्या चोरीस जात असताना ते सुरक्षा बलाच्या जवानांना दिसू नये, याचे आश्चर्य आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बला च्या जवानांची गस्त कागदोपत्री असल्याचे चित्र आहे. रुळाच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या गँग मनला देखील चाव्या चोरीस गेल्या असताना दिसल्या नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने नरखेड मार्ग वाऱ्यावर सोडून प्रवाशाच्या जीविताशी खेळ चालविल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघातAmravatiअमरावती