शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

छावणीच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या २३ गायी, १० बैलांचा मृत्यू

By admin | Published: October 05, 2016 6:10 PM

छावणीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी परप्रांतातून येथे विक्रीसाठी आलेल्या जनावरांपैकी २३ गायी आणि १० बैलांचा अचानक मृत्यू झाला. तर मृत्यूच्या उंबरठ्यावर

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 05 -  छावणीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी परप्रांतातून येथे विक्रीसाठी आलेल्या जनावरांपैकी २३ गायी आणि १० बैलांचा अचानक मृत्यू झाला. तर मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या सुमारे ४० जनावरांवर पशुसंवर्धन चिकित्सालय, मनपा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर उपचार सुरू केले. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ८ उघडकीस आली.  या जनावरांना उपाशीपोटी ठेवल्याने अथवा विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला. 
 पोलिस आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, छावणीमध्ये दर गुरूवारी गुरांचा आठवडी बाजार भरतो. या बाजारात म्हशी आणि गायी,बैल, शेळ्या ,मेंढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. विशेषत: मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील जनावरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील व्यापारी आणि पशुमालक येथे जनावरांची खरेदी विक्री करीत असतात. मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणण्यात येणा-या गायी,म्हशी आणि बैलांना ट्रक, टेम्पोमध्ये अमानुषपणे कोंबलेल्या असतात. सुमारे तीन दिवसांचा त्यांचा हा प्रवास असतो. या प्रवासादरम्यान या जनावरांना खाण्या-पिण्यास दिली जात नाही. 
शिवाय दूरच्या प्रवासादरम्यान त्यांना वाहनात नीट बसता येत नाही आणि उभेही राहता येत नाही, असह्य वेदना सहन करीत त्यांना येथे आणल्या जाते. यामुळे अनेक जनावरे आजारी पडतात. अशाचप्रकारे दोन दिवसापूर्वी गुजरात आणि मध्यप्रदेशातील व्यापाºयांनी सुमारे शंभरहून अधिक गायी आणि बैल येथे वेगवेगळ्या वाहनातून आणले होते. गुरूवारच्या आठवडी बाजारात 
विक्री करण्यासाठी ही जनावरे आणण्यात आली होती. आठवडी बाजारातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना दावणीला बांधून ठेवण्यात आली होती. या शेडमध्ये सुमारे दोनशेहून अधिक जनावरे होती. यापैकी२३ गायी आणि १० बैल हे बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आणि आणखी तेवढीच जनावरे गंभीर आजारी असल्याचे दिसले. याबाबतची माहिती मिळताच महानगर पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त माणिक बाखरे, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, छावणी ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. 
 
तीसगाव शिवारात शवविच्छेदन
पशुंच्या मृत्यूचे अचूक  कारण समोर यावे,याकरीता सर्व मृत पशुंचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तीसगाव येथे शवविच्छेदन केले जात आहे. यासाठी पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचे तज्ज्ञांचे पथक  सहभागी होणार आहे. शिवाय मृत पशुंचा व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
 
आजारी पशुवर उपचार
याची माहिती खडकेश्वर येथील सर्वपशुचिकित्सालयास कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त एम.एन. आठवले, सह आयुक्त डॉ. जी.एन.पांडे, डॉ.एस.के. चंदेल,पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचे डॉ.प्र्रशांत चौधरी, डॉ. डी.बी. कांबळे, डॉ. दिलीप भालेराव, डॉ.विलास काळे,डॉ.अतिश कुलकर्णी, डॉ. आश्रुबा गाढवे,डॉ.लिंबाजी वाघमारे यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले.
 
मरण पावलेल्या पशुंची आणि आजारी पशुंची अवस्था पाहुन चाºयातून विषबाधा झाल्याने अथवा तीन ते चार दिवस विना अन्न पाण्यामुळे तडफडून त्यांचा अंत झाला,असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी शवविच्छेदानानंतरच त्यांच्या मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल. यामुळे सर्व आजारी गायी आणि बैलांवरविषबाधेसह अन्य उपचार सुरू असल्याचे डॉ.पांडे यांनी सांगितले. सध्या आजारी  पशुंना प्रत्येकी पाच सलाईन लावण्यात येत आहे.या उपचारांना ही जनावरे प्रतिसाद देत असल्याचे ते म्हणाले. 
 
छावणी बाजाराच्या कंत्राटदारांवर गुन्हा
छावणीतील आठवडी बाजारात दाखल होणाºया सर्व जनावरांची काळजी घेण्याची जबाबदारीही आठवडी बाजाराचाकंत्राटदार यांची आहे. यामुळे जनावरांच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार अजीम देशमुख यांच्याविरोधात छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी दिली.