शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सागरी मत्स्यशेतीसाठी २३ पिंजऱ्यांची सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2016 10:44 PM

निधीची प्रतीक्षा : प्रकल्प आढाव्यासाठी हैदराबादला होणार बैठक

प्रकाश वराडकर --रत्नागिरी -जगभरात सागरी मत्स्य उत्पादनात घट होत असताना मत्स्य उत्पादन वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. कोकणातील अरबी समुद्रात रत्नागिरी येथेही हा प्रयोग २०१४मध्ये करण्यात आला. त्यात फारसे यश आले नसले तरी आता नव्या दमाने महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, दापोली कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालयाच्या सहकार्याने भगवती बंदराजवळील समुद्रात हा प्रकल्प पुन्हा राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी २३ पिंजऱ्यांची सज्जता केली आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल फिशिंग डेव्हलपमेंट बोर्डाकडून निधीची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाच्या तांत्रिक सहकार्यावर व स्थानिक मच्छिमारांच्या सहभागातून हा प्रकल्प १९ डिसेंबर २०१४ रोजी सुरू करण्यात आला होता. त्यासाठी मिरकरवाडा ते भगवती बंदर दरम्यानच्या समुद्रात किनाऱ्यापासून २०० मीटर अंतरावर पाण्यात अर्धे बुडालेले व काही भाग पाण्यावर असलेले १२ मोठे पिंजरे उभारण्यात आले होते. त्यामध्ये काही लाख रुपयांचे जिताडा व मोडोसा मच्छीचे बीज सोडण्यात आले होते. मात्र, काही त्रुटींमुळे हा प्रयोग फसला. ७५० ग्रॅम वजनाचे २३२ किलो मासे मिळाले होते. त्यामुळेच २०१५ मध्ये हा प्रकल्प त्रुटी दूर करून यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासाठी आवश्यक निधी न मिळाल्याने २०१५मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला नाही. मत्स्योद्योग विकास मंडळाच्या माध्यमातून दापोली कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालयाच्या तांत्रिक सहकार्याने हा प्रकल्प २०१६मध्ये राबविण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पिंजऱ्यातील मत्स्यशेती अर्थात केज फिशिंग कल्चर कोकणात रूजविण्यास पोषक स्थिती आहे. याचा अभ्यास करूनच ही मत्स्यशेती कोकणच्या सागरी किनाऱ्यावर राबवून मत्स्य उत्पादनात वाढ करणे, हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. त्यामुळे रत्नागिरीत हा प्रकल्प राबवणाऱ्या यंत्रणेमार्फत पिंजऱ्यातील मत्स्यशेतीसाठी नवीन १२ पिंजरेही तयार करण्यात आले आहेत. सन २०१४मध्ये प्रकल्पासाठी वापरलेले १२पैकी ११ पिंजरेही प्रकल्पासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. यंदा हा प्रकल्प राबवण्यासाठी प्रकल्पाचा आढावा घेण्याकरिता येत्या ७ सप्टेंबरला हैदराबाद येथे रत्नागिरीतील प्रकल्प संबंधितांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. रत्नागिरीत सर्वप्रथम प्रयोगतत्कालिन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कोकणच्या सागरी हद्दीत हा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रोत्साहन दिले होते. जगभरात पिंजऱ्यातील मत्स्यशेतीचे असंख्य प्रकल्प अस्तित्त्वात आहेत. त्यातून खात्रीशीर मत्स्य उत्पादनही मिळत आहे. त्यामुळेच सर्वप्रथम रत्नागिरीच्या समुद्रात पिंजऱ्यातील मत्स्यशेती हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हा प्रकल्प राबवल्यानंतर यशस्वी होणार काय, याची चर्चा मच्छीमारांमध्ये सुरू आहे. खासगी स्तरावरही मत्स्यशेती लाभदायीपर्ससीन व पारंपरिक मच्छीमारांमध्ये क्षेत्रावरून वाद आहेत. त्यामुळे पर्ससीन मच्छीमारीला केवळ चार महिने मच्छीमारीसाठी परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या मच्छीमारांनीही पिंजऱ्यातील मत्स्यशेतीचे प्रकल्प राबवल्यास त्यातून अधिक प्रमाणात मत्स्य उत्पादन घेतले जाऊ शकेल. मच्छीमारांच्या उत्पन्नातही त्यामुळे भर पडेल, असे जाणकारांना वाटते आहे.