शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

२३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

By admin | Published: July 18, 2016 4:32 AM

मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी रद्द केले

पुणे : शेतकऱ्यांच्या उसाला किमान हमी भाव (एफआरपी) न देता १४२ कोटी रूपये थकविल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी रद्द केले आहेत. १४ दिवसांत शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे पैसे देणे आवश्यक असताना या कारखान्यांकडून त्याची पूर्तता न केल्यामुळे आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.बीड जिल्ह्यातील ३ कारखान्यांसह राज्यातील २३ कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांचे १४२ कोटी रूपये थकविले आहेत. दुष्काळातून शेतकरी सावरत असताना, त्यांना साखर कारखान्यांनी मदतीचा हात देणे आवश्यक असताना पैसे दिले जात नसल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित भाऊराव चव्हाण कारखाना आणि पुणे जिल्ह्यातील माजी खासदार विदुरा नवले यांच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)