शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राज्यात २४ टक्के कमी पाऊस

By admin | Published: October 08, 2015 5:38 AM

यंदाच्या हंगामात राज्यात मॉन्सूनचा पाऊस सरसरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात परभणी, जळगाव, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत

पुणे : यंदाच्या हंगामात राज्यात मॉन्सूनचा पाऊस सरसरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात परभणी, जळगाव, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तर सरासरीपेक्षाही ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विदर्भ विभागात बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सरासरीइतका बरसला आहे. यंदाच्या हंगामात मॉन्सूनने बळीराजाला प्रचंड ओढ दिली आहे. मॉन्सून दाखल झाल्यापासून १ जून ते ३० सप्टेंबर २०१५ यादरम्यान राज्यात सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला आहे. परभणीमध्ये तर सरासरीपेक्षा ५५ टक्कयांनी पाऊस कमी झाला आहे. यंदा मॉन्सून राज्यात दाखल झाल्यापासून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अल्पच राहिले आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)देशात १४ टक्के कमी पाऊसमहाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांनासुद्धा एल निनोचा फटका बसला असून, अनेक राज्यांमध्ये यंदा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी झाला आहे़ पूर्व उत्तर प्रदेशात सर्वाधिक सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस कमी झाला आहे़ दिल्ली- ४३, हरियाणा- ३७, पूर्व मध्य प्रदेश- २९, बिहार, उत्तराखंड- २८ टक्के कमी पाऊस झाला आहे़ गुजरात- ६ टक्के, पश्चिम मध्य प्रदेश- ४, आंध्र किनारपट्टी- १०, पश्चिम बंगाल किनारपट्टी- ८ आणि अरुणाचल प्रदेश- ६ टक्के या काही विभागांतच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे़ बाकी अन्य सर्व हवामान विभागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ विभागनिहाय पाऊसविभागसरासरीपेक्षा कमीकोकण व गोवा३२%मध्य महाराष्ट्र३४%मराठवाडा४१%विदर्भ१२%सर्वाधिक दुष्काळी जिल्हेजिल्हासरासरीपेक्षा कमी परभणी५५%जळगाव५४%बीड, सोलापूर५२%लातूर५१%परभणी४७%