शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२०० टँकरद्वारे ३५ टंचाईग्रस्त गावांना पुरविले अडीच लाख लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 10:50 IST

बार्शी तालुक्याला जैन समाजाची मदत; महावीर जयंतीनिमित्त राबविला उपक्रम

ठळक मुद्देकमी पावसामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईबार्शी तालुक्यातील तहानलेल्या गावांना व गावकºयांना सकल जैन समाजाच्या वतीने पाण्याच्या माध्यमातून नवजीवनच मिळाले पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन उन्हाच्या तीव्रतेचा सामना करणाºया तालुक्यातील माता - भगिनींना मोफत पाणीपुरवठा सुरू

बार्शी  : बार्शीतील सकल जैन समाजाच्या वतीने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तहानलेल्या गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे मोफत पुरविण्यात येत असून, श्री भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून बार्शीतील श्री भगवान महावीर जन्मकल्याणक समितीच्या वतीने २५ एप्रिलपासून तालुक्यात आजअखेर २०० टँकरद्वारे ३५ गावांना २़५ लाख लिटर पिण्याचे पाणी मोफत पुरविण्यात आले आहे. 

यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, बार्शी तालुक्यातील तहानलेल्या गावांना व गावकºयांना सकल जैन समाजाच्या वतीने पाण्याच्या माध्यमातून नवजीवनच मिळाले आहे. पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन उन्हाच्या तीव्रतेचा सामना करणाºया तालुक्यातील माता - भगिनींना मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज सुमारे २० खेपा करून २़५ लाख लिटर पाणी ग्रामीण भागातील जनतेला देण्यात येत आहे. लोकवर्गणीतून देणगीदारांनी दिलेल्या आर्थिक मदतीसह शहरातील काही दानशूर व्यक्तींंनी आपल्या बोअरमधून मोफत पाणी या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यात बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, उद्योजक चंद्रकांत सोनिग्रा, शेतकरी नितीन ताटे व व्यापारी सतीश जाजू यांनी या उपक्रमाला पाणी उपलब्ध करून दिले आहे. 

हा उपक्रम यशस्वीतेसाठी समितीचे प्रदीप बागमार, अजित कुंकूलोळ, धन्यकुमार शहा, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, गोविंद बाफणा, पवन श्रीश्रीमाळ, राजन कोठारी, भरत वखारिया, पारस कांकरिया व समिती सदस्य परिश्रम घेत आहेत़ 

या गावांना मिळाला लाभ- बार्शी तालुक्यातील सौंदरे, घाणेगाव, शेंद्री, तांदुळवाडी, बोरगाव झाडी, मांडेगाव, कदमवस्ती, कुसळंब, धानोरे, ढेंबरेवाडी,इर्ले, भोर्इंजे, सुर्डी, दडशिंगे, कांदलगाव, पिंपरी, नारेवाडी, हिंगणगाव, धसपिंपळगाव, कळंबवाडी, गोरमाळे, बोरगाव, भोयरे, फपाळवाडी, साकत, तावडी, खामगाव, नारी आदी गावांना मोफत पिण्याचे पाणी एक दिवसाआड टँकरद्वारे पुरविण्यात आले आहे. यापूर्वी २०१६ मध्येही सुमारे १६०० टँकरच्या खेपा करून बार्शी तालुक्यातील गावांना सकल जैन समाजाने महावीर जन्मकल्याण समितीच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा केला होता. दुष्काळी परिस्थितीत नेहमीच बार्शी ग्रामीण भागात सकल जैन समाजाने पिण्याचे पाणी पुरवले आहे.

टँकरसाठी मदतीचा ओघ..- सकल जैन समाज बार्शीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पाणी टँकर योजनेसाठी मुंबई येथील सांताकू्रझ जैन ट्रस्टनेदेखील १२० टँकरसाठी निधी दिला आहे. पारगाव (बीड) चे अजित ताराचंदजी डुंगरवाल यांनी ५१ टँकरसाठी निधी दिला आहे. स्व.कमलबाई भंवरीलालजी फुलफगर परिवार ( घोडनदी) यांनी २१ टँकरसाठी निधी दिला आहे. तसेच बार्शीच्या सुभाषनगरस्थित हॅपी मॉर्निंग ग्रुपने २१ टँकरसाठी निधी दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरJain Templeजैन मंदीरdroughtदुष्काळTemperatureतापमानwater transportजलवाहतूक