शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

...तर महाराष्ट्रावरील २५ टक्के कर्ज फिटेल !

By admin | Published: March 30, 2016 3:19 AM

वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा योग्य पद्धतीने पुनर्विकास केल्यास संबंधितांच्या मागण्या पूर्ण करूनही राज्याला तब्बल ७७ हजार कोटींचा आर्थिक लाभ होऊ शकतो. या रकमेतून राज्यावरील तब्बल एक चतुर्थांश

चंद्रकांत पाटील यांचा दावा : वांदे्र येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकासमुंबई : वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा योग्य पद्धतीने पुनर्विकास केल्यास संबंधितांच्या मागण्या पूर्ण करूनही राज्याला तब्बल ७७ हजार कोटींचा आर्थिक लाभ होऊ शकतो. या रकमेतून राज्यावरील तब्बल एक चतुर्थांश कर्ज फेडता येईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.शासकीय वसाहतीमधील इमारती मोडकळीस आल्या आहेत, तर काही इमारतींची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी अपुरा पडत असल्याने तेथे राहत असलेले शासकीय कर्मचारीच स्वखर्चाने दुरुस्तीची कामे करत असल्याबाबतचा मुद्दा शिवसेनेचे अनिल परब यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. वसाहतीच्या दुरुस्तीतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार का, असा प्रश्नही परब यांनी केला. यावर बोलताना पाटील म्हणाले की, मुंबईतील दमट हवामानामुळे इमारतीचे स्टील, लोखंड गंजते. त्यामुळे या इमारतींची दुरवस्था झाली असून एकूण ३७० पैकी ३६ इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. वांद्रे येथील शासकीय कर्मचाऱ्यांचा वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच निविदा काढल्या जातील. ७७ हजार कोटींचा फायदा अपेक्षितलार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीने अहवालानुसार योग्य पद्धतीने पुनर्विकास झाल्यास ४ लाख ५० हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. यातून कर्मचाऱ्यांसाठी वसाहत, सध्या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बांधकाम खर्च घेऊन स्वत:च्या मालकीची घरे, येथील झोपड्यांचा एसआरए प्रकल्प आणि उच्च न्यायालयासाठीची जागा अशा गरजा भागविता येणार आहेत. इतके करूनही राज्य शासनाला ७७ हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता असून या पैशांतून राज्यावरील २५ टक्के कर्ज फेडता येईल.