शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

राज्यात डेंग्यूचे २६२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2016 2:29 AM

पावसाला सुरुवात झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारखे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यंदा राज्यात पाऊस लांबल्याने आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात

मुंबई : पावसाला सुरुवात झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारखे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. यंदा राज्यात पाऊस लांबल्याने आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात नवीन डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात २६२ डेंग्यूचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षी १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबरदरम्यान राज्यभरात ५ हजार ६५३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, डेंग्यूमुळे २२ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. मुंबईत आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे २२८ रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रांमध्ये मुंबईत यंदा सर्वाधिक म्हणजे ९४१ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले, तर नाशिक येथे ७७५, पुण्यात ५९६ आणि ठाण्यात २९९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. कोल्हापूर जिल्ह्यात २६५, नाशिकमध्ये २५३ आणि पुण्यात १७० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यंदा राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यभरात चिकनगुनियाचे २ हजार २८० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी महापालिका क्षेत्रात २ हजार ५ तर उर्वरित ग्रामीण भागात २७५ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)चिकनगुनियाचेही आढळले रुग्णडेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव हा एडिस डासांपासून होतो. साचलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. राज्यात आॅक्टोबरपर्यंत पाऊस पडत असल्याने आॅक्टोबर महिन्यातही डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबरमध्येही डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. - आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित ताप सर्वेक्षण- तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेऊन प्रयोगशाळेत मोफत तपासणी - अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या ठिकाणी धूरफवारणी अशा प्रकारच्या उपायोजना केल्या जात आहेत.- नागरिकांना सतर्कतेचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आल आहे.