शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

२७ गावे, एमआयडीसीत ठणठणाट

By admin | Published: June 05, 2017 3:27 AM

तीन दिवस एमआयडीसीकडून २७ गावे आणि एमआयडीसी निवासी भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पाणीकपातीमुळे शुक्रवारी शटडाउन, त्यात मध्यरात्री फुटलेली जलवाहिनी आणि रविवारी पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ केंद्रात झालेला तांत्रिक बिघाड, असे सलग तीन दिवस एमआयडीसीकडून २७ गावे आणि एमआयडीसी निवासी भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी, तेथील रहिवाशांचे पाणीटंचाईमुळे प्रचंड हाल झाले. केडीएमसी हद्दीतील २७ गावे आणि एमआयडीसी निवासी विभाग यांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. सध्या लघुपाटबंधारे विभागाकडून लागू असलेल्या पाणीकपातीमुळे या भागांमधील पाणीपुरवठा दरशुक्रवारी बंद ठेवला जातो. मध्यरात्री १२ नंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याचा दाब वाढल्याने जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी काटईनाका परिसरात फुटली. या घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी दुपारी १ पर्यंत चालल्याने दिवसा पाणी मिळाले नाही. रात्री ८ च्या सुमारास कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे पुरेशा प्रमाणात रहिवाशांना पाणी उपलब्ध झाले नाही. दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जांभूळ केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी बंद केल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांनी दिली. जलवाहिनी फुटीच्या घटनेला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत. जीर्ण जलवाहिन्या बदलण्याऐवजी त्या केवळ दुरुस्त केल्या जात आहेत. कोळवली आणि काटई येथे मोठ्या प्रमाणावर अशा जलवाहिन्या आहेत. केवळ दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी कंत्राटदारांचे भले करत असल्याचा आरोप म्हात्रे यांचा आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा मोबाइल बंदएकीकडे धरणांत पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतानाही तीन दिवस घरांमध्ये पाणी नाही. त्यामुळे रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, त्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना असल्याचे स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले. पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास एमआयडीसी कार्यालयावर धडक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.