शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

कोकणातील पाच जिल्ह्यांना २८४३ कोटी, आपत्ती निवारणासाठी निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 5:30 AM

गेल्या अडीच वर्षातील सरकारने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी कुठलाच निधी दिला नव्हता.

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांसाठी २,८४३ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यात ठाणे १८८ कोटी, पालघर २८३ कोटी, रायगड ९९६, रत्नागिरी ७०० कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६७७ कोटी यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

सामंत म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील सरकारने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी कुठलाच निधी दिला नव्हता. मात्र आता कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपत्ती निवारणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. रायगड जिल्ह्याला मिळालेल्या ९९६ कोटींपैकी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी १५० कोटी, बहुउद्देशीय निवारा केंद्रासाठी १५०, भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी ७०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेल्या निधीतून ही तीन प्रमुख कामे करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

डीपीडीसीचा निधी मंत्री सामंत म्हणाले की, यावर्षीचा नियतव्ययही वाढवून तो ३०० कोटींवर नेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ९ कोटी नगरविकासासाठी वाढवून दिले आहेत. त्यामुळे डीपीडीसीचे पैसे वाढले आहेत. या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्याला आपत्कालीन निवारणासाठी ८०० रुपयांचा स्वतंत्र निधी मिळाला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :konkanकोकण