शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:13 IST

ऊस नसल्याचे कारण; राज्यात ४५६ लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन

ठळक मुद्देदरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा ५२ लाख गाळप करुन तिसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा ९५ लाख ५७ हजार मे. टन गाळप करुन प्रथम क्रमांकावरमराठवाड्यातील केवळ जालना व बीड या दोन जिल्ह्यातील गाळप ८ लाखांपेक्षा अधिक झाले

सोलापूर :  यंदा ऊस गाळप हंगामावर कमालीचा परिणाम होईल असे दिसत असून सुरू झालेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली वगळता अन्य जिल्ह्यातील गाळप हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात आटोपला जाईल असे सांगण्यात आले.

मागील वर्षी राज्यात पाण्याची मोठी तीव्रता होती. जानेवारीपासून १० आॅगस्टपर्यंतचा कालावधी  हा कडक उन्हाचा होता. यामुळे  उसासह सर्वच पिके करपली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील   ऊस क्षेत्र उन्हाच्या तडाख्यातून वाचले होते; मात्र पुरामुळे  नुकसान झाले होते. सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा पट्टा वगळता अन्य ठिकाणचा ऊस जळाला होता. यामुळे यावर्षी अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला नाही.

कोल्हापूर, पुणे व  सोलापूर विभागातील ९० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता व त्यापैकी तीन कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागातील तीन व औरंगाबाद विभागातील ७ कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम आटोपला आहे.  म्हणजे गाळप हंगाम सुरू केलेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरला सुरू झालेले कारखाने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बंद होण्यास सुरुवात झाली असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात बºयापैकी हंगाम आटोपला जाईल असे सांगण्यात आले. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ४१८ लाख मे. टन ऊस गाळप केला असून ४५६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातच ५० लाखांपेक्षा अधिक गाळप कमी होणार आहे. 

राज्यातील साखर हंगामावर एक नजर

  • -   कोल्हापूर जिल्हा ९५ लाख ५७ हजार मे. टन गाळप करुन प्रथम क्रमांकावर असून, पुणे जिल्हा ५८.८८ लाख मे.टन गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहे.
  • -   दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा ५२ लाख गाळप करुन तिसºया क्रमांकावर आहे. ऊस क्षेत्राची स्थिती पाहता सोलापूर जिल्हा गाळपात आणखीन मागे येईल असे सांगण्यात आले.
  • -  सातारा जिल्हा ४८ लाख ८१ हजार मे.टन, सांगली जिल्हा ४६.७१ लाख व अहमदनगर जिल्हा ४४.१५ लाख मे.टन  गाळप झाले आहे.
  • -   मराठवाड्यातील केवळ जालना व बीड या दोन जिल्ह्यातील गाळप ८ लाखांपेक्षा अधिक झाले असून अन्य जिल्ह्याचे गाळप फारच कमी आहे. 

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने व गाळप होणारा सोलापूर जिल्ह्यातील एक साखर कारखाना बंद झाला आहे. ऊस तोडणी यंत्रणा अपुरी असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. यामुळेच ऊस कमी असला तरी कारखाने सुरू आहेत. जवळपास सर्वच कारखाने १० मार्चपर्यंत बंद होतील.  - रविकांत पाटील

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरahmadpur-acअहमदपूरPuneपुणे