शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

महावितरणला ३०६ कोटींची मदत

By admin | Published: November 10, 2014 4:21 AM

वीजदरात सवलत दिल्यामुळे महावितरणला सोसावा लागलेला घाटा सावरण्यासाठी राज्य सरकारने ३०६ कोटी रुपयांचे भरीव अर्थसाहाय्य मंजूर केले आहे

शहापूर : वीजदरात सवलत दिल्यामुळे महावितरणला सोसावा लागलेला घाटा सावरण्यासाठी राज्य सरकारने ३०६ कोटी रुपयांचे भरीव अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी ग्राहक यांना वीजदरात सवलत दिल्यामुळे तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती, फळपिकांच्या नुकसानीसाठी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना वीजदेयके माफ केल्याने हा तोटा झाला होता. ५ नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.२०१३मध्ये झालेली वीज दरवाढ कमी करून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंप ग्राहकांचे ० ते ३०० युनिटपर्यंतचे दर समकक्ष पातळीवर आणण्यात आले होते. २०१४मध्ये फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोकणासह विदर्भ, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर या भागांतील शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला होता. शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी शासनाने घेतला होता. महावितरण कंपनीचा घाटा लक्षात घेऊन सवलतीपोटी ७०६ कोटी व अधिक तरतूद १०० कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता देण्यात आली होती. २०१४-१५च्या अर्थसंकल्पातही १०,५०० कोटी मूळ तरतूद, ९ हजार कोटींची अधिक पुरवणी मागणी १५०० कोटी रकमेची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार, ७२३७ कोटी ११ लाख रु पये रकमेचे वाटप महावितरण कंपनीला केले आहे. उर्वरित ३०६ कोटींची रक्कम प्रस्तावित होती. त्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या अर्थसाहाय्यातून वीज वितरण कंपनीचा घाटा सावरला आहे. (प्रतिनिधी)