शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

आजारांनी आठ महिन्यांत ३१ जणांचा मृत्यू!

By admin | Published: November 05, 2016 3:45 AM

चिकणगुन्यावगळता जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारात ४०८ जण सापडले

सुरेश लोखंडे,

ठाणे- चिकणगुन्यावगळता जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारात ४०८ जण सापडले असून, यापैकी ३१ जणांचा या किरकोळ आजारांनी जीव घेतला आहे. यातील ११ जणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून, आरोग्य यंत्रणेला उर्वरित २० जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप शोधता आलेले नाही. मृत्यूची सर्वाधिक संख्या कल्याण-डोंबिवली महापालिकेसह मीरा-भार्इंदरमध्ये अधिक असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या निश्चित तापांच्या साथीसह अन्य तापाची २५ ठिकाणी साथ उद्भवली आहे. त्यातील ३१ जणांचा मृत्यू या आठ महिन्यांत ओढावला आहे. यातील एक मृत्यू नुकताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काचोळे तीसगाव येथील डेंग्यूच्या साथीदरम्यान झाला आहे. मात्र त्याचा मृत्यू डेग्यूनेच झाला, हे स्पष्ट व्हायचे आहे. जिल्ह्यात मलेरियाची साथ सहा ठिकाणी उद्भलेली आहे. यामध्ये ६३ जणांना या साथीची लागण झाली असता त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डेंग्यूच्या साथीच्या रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात या २४ जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर नगरपालिकांमध्ये दोन मृत्यू झाले असून, ग्रामीण व आदिवासी भागात देखील चार मृत्यूची नोंद आढळून आली आहे. >आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वाधिक १३ जाणांचा मृत्यू झाला आहे. या खालोखाल मीरा-भार्इंदर महापालिकेत आठ रुग्ण दगावले आहेत. ठाण्यात दोन, भिवंडी महापालिकासह ग्रामीण भागात तीन मृत्यू झाले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये दोन मृत्यू आहेत. शहापूर, मुरबाडच्या आदिवासी व ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू या साथीच्या किरकोळ आजारांनी ओढावलेला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून उघड झाले आहे. या साथीच्या आजारांमध्ये झालेल्या मृत्यूची संख्या महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आढळून आली आहे. यामुळे महापालिकांच्या आरोग्य यंत्रणेसह साफसपाईच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.