शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

३२ वर्षांच्या लढ्याने माळरानावर फुलली हिरवळ!

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची

- अनिल गवई, खामगाव (बुलडाणा)धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची शर्यत पार करून, तब्बल ३२ वर्षांनंतर २५० एकर माळरानावर हिरवळ फुलवली. ही यशोगाथा आहे, पिंपरी धनगर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या सामूहिक लढ्याची. १९८७-८८ साली मन प्रकल्पाचे काम सुरू झाले, त्यावेळी पिंपरी धनगर हे गाव या प्रकल्पाच्या पात्रात येत असल्यामुळे गावाचे जलाशयापासून ६०० मीटर अंतरावर पुनर्वसन करण्यात आले. सधन आणि सुखसंपन्न गावाच्या इतिहासाला त्याचवेळी जलसमाधी मिळाली. पुनर्वसित ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेती पिकत नव्हती. त्यामुळे काहींनी गाव सोडले. वस्तुत: मन प्रकल्पातील सहा टक्के जलसाठा पुनर्वसित गावासाठी आरक्षित असताना केवळ प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे जलाशयाचे पाणी त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे हळूहळू आंदोलन उभे राहीले. या लढ्यामुळे १६ मे तसेच २६ डिसेंबर २०१३ आणि २५ जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विविध प्रशासकीय मान्यतांचे प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे प्रिंपी धनगर येथील ग्रामस्थांना जलाशयातील पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर जानेवारी २०१६च्या पहिल्या आठवड्यात प्रिंपी येथील २७ शेतकऱ्यांना जलाशयाचे पाणी मिळाले. पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी कांदा, भुईमूग आणि गव्हाचे उत्पादन घेतले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले असून, अनेकांच्या शेतात कांद्याचे पीक बहरत आहे.गोवऱ्या वेचणाऱ्या हातांना मिळाला रोजगार!शेती पिकत नसल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी गावातून स्थलांतर केले होते. काहींनी माळरानावरील गोवऱ्या वेचून त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला; मात्र आता तब्बल २५० एकर जमीन ओलिताखाली आल्याने ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे. वनविभागाकडे एक लाखाचा भरणा!लोकवर्गणीतून पिंप्री धनगरवासीयांनी वन विभागाकडे १ लाख दहा हजार रुपयांचा भरणा केला. वृक्ष लागवडीसाठी आता हे गावकरी धडपडत आहेत. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या माळरानावर ३२ वर्षांनंतर हिरवळ फुलली आहे. या आंदोलनाला यश आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे.- आशाताई सुनील जाधव, सरपंच, पिंप्री धनगर, खामगाव