शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

३,२२८ शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या

By admin | Published: March 05, 2016 2:55 AM

मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे

नवी दिल्ली : मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले.शेतीला व्यवहार्य बनविणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे विविध योजना राबवीत आहेत, असे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या वर्षभरात ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि २००१ पासूनचा आत्महत्यांचा हा उच्चांक आहे,’ असे सिंह यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून ३०४९.३६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवीत आहे, असेही कृषिमंत्री सिंह यांनी सांगितले.१२ लाख हेक्टर शेतजमिनीचा वापरच नाहीदेशात १२ लाख हेक्टर शेतजमीन कुठल्याही वापराशिवाय पडली असून विविध राज्यांमध्ये पट्टे देण्यासंदर्भात असलेले स्वतंत्र कायदे हे यामागील एक मुख्य कारण असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी राज्यसभेत हा खुलासा केला. शेतीयोग्य जमीन कंपन्या आणि उद्योगांना दिली जाण्याची शंका विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली होती. या शंकांचे निरसन करताना या बैठकीचे उद्योगांशी काहीही देणेघेणे नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्राच्या अमरावती विभागात सर्वांत जास्त म्हणजे १,१७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात १,१३०, नाशिक विभागात ४५९, नागपूर विभागात ३६२, पुणे विभागात ९६ आणि कोकण विभागात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.३,२२८ पैकी १,८१९ प्रकरणे अनुदानास पात्रया ३,२२८ आत्महत्या प्रकरणांपैकी १,८४१ प्रकरणे सानुग्रह अनुदानास पात्र ठरली आहेत, तर ९०३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ४८४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली.